- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची १९ महिन्यांच्या वेतनातील फरकातील प्रलंबित रकमेपैकी १९ महिन्यांच्या फरकाची रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने चार कोटी ४० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहे.दिवाळीपूर्वीच सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात नऊ महिन्यांच्या फरकातील प्रलंबित रक्कम थेट जमा होणार असल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सफाई कामगार,शिपाई, दिवाबत्ती व पाणीपुरवठा कर्मचारी,लिपिक,करवसुली कारकून आदी कर्मचारी आहेत.शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात केलेल्या वाढीनंतर एप्रिल २००० पासून सुधारित वेतन देण्यास सुरुवात झाली. मात्र,सप्टेंबर २०२० ते मार्च २०२२ या १९ महिन्यांच्या कालावधीतील फरकाची रक्कम अद्याप मिळालेली नव्हती.शासनाने सप्टेंबर २०२० ते २०२१ या नऊ महिन्यातील वेतनातील फरक देण्याचा निर्णय घेतला आहे.उर्वरित दहा महिन्यांची थकीत रक्कमसुद्धा लवकरच देण्यात येईल,त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळणार असल्याने दिवाळी गोड होणार आहे.
- Advertisement -

