Tuesday, July 7, 2026
Homeचंद्रपूरशासकीय कामांत अनियमितता; शिक्षणाधिकारी निलंबित...

शासकीय कामांत अनियमितता; शिक्षणाधिकारी निलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्हा परिषदेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक)कल्पना चव्हाण यांच्यावर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव टी.वाय. करपते यांनी निलंबनाची कारवाई केली.सदरच्या कारवाईने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.चव्हाण ह्या सध्या जळगावच्या जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत आहेत.
चंद्रपूरच्या माध्यमिक शिक्षण विभागात कल्पना चव्हाण या तीन वर्षांपूर्वी रुजू झाल्या होत्या.त्यांच्या कार्यकाळात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवली जात होती.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे संघटनेला कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच तक्रारी सतत प्राप्त होत होत्या.शासकीय कामांत अनियमितता करणे,यासह त्यांच्यावर गंभीर आरोप होते.विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने आमदार सुधाकर अडबाले यांनी त्यांच्याविरुद्ध अनेकदा आंदोलने केली. अखेर शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या तपासणी पथकाने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाची चौकशी केली.
त्यात त्या दोषी आढळून आल्या.चव्हाण यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९च्या नियम १० अन्वये आयुक्त (शिक्षण) पुणे यांनी दोषी ठरविले होते.मात्र,निलंबनाची कारवाई झाली नव्हती.याबाबत आमदार अडबाले यांनी ५ जुलै २०२४ रोजी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. चव्हाण यांना कारणे द्या नोटीस बजावण्यात आले. नोटीसला उत्तर मिळाल्यानंतर निलंबित करण्याचा निर्णय सोमवारी २६ ऑगस्ट रोजी घेण्यात आला.
निलंबन काळात खासगी नोकरी अथवा व्यवसाय केल्यास त्या गैरवर्तणुकीबाबत दोषी ठरतील व कारवाईस पात्र ठरून निर्वाह भत्त्यावरील हक्क गमावून बसतील,असेही निलंबन आदेशात नमूद केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!