Tuesday, September 1, 2026
Homeमुंबईवकिली व्यवसायात टक्केवारीच्या स्वरुपात फीची मागणी करणे म्हणजे नियमांचे उल्लंघन... -मुंबई उच्च...

वकिली व्यवसायात टक्केवारीच्या स्वरुपात फीची मागणी करणे म्हणजे नियमांचे उल्लंघन… -मुंबई उच्च न्यायालय…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-वकिलांच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.कोणतीही केस लढण्यासाठी वकील त्यांच्या क्लाईंटकडून टक्केवारीच्या स्वरूपात फी मागणी करू शकत नाही; असे मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. ठाण्यातील एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे.तसेच ठाणे दंडाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश उच्च न्यायालयाने रद्द केले असून त्यासंबंधित गुन्हाही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
ठाण्यातील वकील शैलेश अमृतलाल शाह यांनी ठाणे दंडाधिकाऱ्यांसमोर त्यांच्या स्वतःच्या क्लाईंटच्या म्हणजेच प्रगी रामजी ठक्कर यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती.त्यांनी प्रत्येक पक्षकाराला सेटलमेंट मोबदल्याच्या १ टक्के म्हणजे ११,००,००० रुपयांची फी स्वरूपात मागणी केली होती.विशेष म्हणजे १९ सप्टेंबर २०१४ रोजी दंडाधिकाऱ्यांनी नौपाडा पोलिस स्टेशनला संबंधित क्लाईंटविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले होते.मात्र,या आदेशाला ठक्कर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ एस.एस.बुटाला यांनी यासंदर्भात असा युक्तिवाद केला की,दंडाधिकाऱ्यांनी तक्रारदाराने कलम १५४ (१) किंवा (३) नुसार आवश्यक पूर्ततेची खात्री न करता एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले होते.वकिली व्यवसायात टक्केवारीच्या रुपात फीची मागणी करणे म्हणजे नियमांचे उल्लंघन केल्याचे देखील यात म्हणले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ज्येष्ठ विधिज्ञ एस.एस.बुटाला यांच्या युक्तिवादाला ग्राह्य धरत अशा प्रकारची कारवाई सुरू ठेवणे म्हणजे कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग होईल; असे मत व्यक्त केले आहे. खंडपीठाचे न्यायमूर्ती भारती डांगे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांनी जेएमएफसी ने दिलेला २०१४ चा आदेश बाजूला ठेवत तक्रारदार वकील शैलेश शाह यांनी दाखल केलेला एफआयआर रद्द केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!