Friday, May 22, 2026
Homeमुंबईवकिली व्यवसायात टक्केवारीच्या स्वरुपात फीची मागणी करणे म्हणजे नियमांचे उल्लंघन... -मुंबई उच्च...

वकिली व्यवसायात टक्केवारीच्या स्वरुपात फीची मागणी करणे म्हणजे नियमांचे उल्लंघन… -मुंबई उच्च न्यायालय…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-वकिलांच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.कोणतीही केस लढण्यासाठी वकील त्यांच्या क्लाईंटकडून टक्केवारीच्या स्वरूपात फी मागणी करू शकत नाही; असे मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. ठाण्यातील एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे.तसेच ठाणे दंडाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश उच्च न्यायालयाने रद्द केले असून त्यासंबंधित गुन्हाही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
ठाण्यातील वकील शैलेश अमृतलाल शाह यांनी ठाणे दंडाधिकाऱ्यांसमोर त्यांच्या स्वतःच्या क्लाईंटच्या म्हणजेच प्रगी रामजी ठक्कर यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती.त्यांनी प्रत्येक पक्षकाराला सेटलमेंट मोबदल्याच्या १ टक्के म्हणजे ११,००,००० रुपयांची फी स्वरूपात मागणी केली होती.विशेष म्हणजे १९ सप्टेंबर २०१४ रोजी दंडाधिकाऱ्यांनी नौपाडा पोलिस स्टेशनला संबंधित क्लाईंटविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले होते.मात्र,या आदेशाला ठक्कर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ एस.एस.बुटाला यांनी यासंदर्भात असा युक्तिवाद केला की,दंडाधिकाऱ्यांनी तक्रारदाराने कलम १५४ (१) किंवा (३) नुसार आवश्यक पूर्ततेची खात्री न करता एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले होते.वकिली व्यवसायात टक्केवारीच्या रुपात फीची मागणी करणे म्हणजे नियमांचे उल्लंघन केल्याचे देखील यात म्हणले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ज्येष्ठ विधिज्ञ एस.एस.बुटाला यांच्या युक्तिवादाला ग्राह्य धरत अशा प्रकारची कारवाई सुरू ठेवणे म्हणजे कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग होईल; असे मत व्यक्त केले आहे. खंडपीठाचे न्यायमूर्ती भारती डांगे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांनी जेएमएफसी ने दिलेला २०१४ चा आदेश बाजूला ठेवत तक्रारदार वकील शैलेश शाह यांनी दाखल केलेला एफआयआर रद्द केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!