Thursday, April 16, 2026
Homeनागपूरस्वच्छतेचा केलेला दावा खरा की खोटा; चक्क न्यायाधीश 'ऑन दी स्पॉट'..!

स्वच्छतेचा केलेला दावा खरा की खोटा; चक्क न्यायाधीश ‘ऑन दी स्पॉट’..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-आपण अनेकदा बघतोय की,केवळ न्यायालयात बसून एखाद्या न्यायमूर्तीद्वारे न्यायनिर्वाळा केला जातो.पण,नागपूर शहरातील सार्वजनिक विहिरी वाचविण्यासाठी करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर महानगर पालिकेने स्वच्छतेचा केलेला दावा खरा की खोटा,यासाठी चक्क मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे दोन न्यायमूर्तिद्वय यांनी ‘ऑन दी स्पॉट’ नागपूर शहरातील विविध सार्वजनिक विहिरींच्या परिस्थितीची पाहणी केली. यात नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व तृषाली जोशी यांनी काल मंगळवारी सायंकाळी नागपूर शहरात स्वतः फिरून सार्वजनिक विहिरींच्या परिस्थितीची पाहणी केली.त्यांच्यासोबत प्रकरणाशी संबंधित वकील व मनपाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रकरण असे की,सार्वजनिक विहिरी वाचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदेश सिंगलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली.त्यानंतर याचिकाकर्त्यांनी त्यावर प्रत्युत्तर सादर करून महानगर पालिका आयुक्तांची माहिती खोटी असल्याचा दावा केला व सार्वजनिक विहिरींच्या दयनीय अवस्थेची छायाचित्रे रेकॉर्डवर आणली.सदरचे प्रकरण काल मंगळवारी न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आले असता मनपाचे वकील ॲड.सुधीर पुराणिक यांनी प्रतिज्ञापत्रातील माहिती बरोबर असल्याचे सांगितले,तर याचिकाकर्त्यांच्या वकील ॲड.स्मिता सिंगलकर यांनी सार्वजनिक विहिरींची दुरावस्था कायम असल्याचे नमूद केले.त्यामुळे न्यायमूर्तीनी स्वतः सार्वजनिक विहिरींची परिस्थिती पाहण्याचा निर्णय घेतला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!