- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
जळगाव :-जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावामध्ये शेतातील तारेच्या कुंपणाला सोडलेल्या विद्युत प्रवाहाला स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज, बुधवार २० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली. मृतांमध्ये विकास रामलाल पावरा वय ३५ वर्षे,पत्नी सुमन विकास पावरा वय ३० वर्षे,दोन लहान मुले पवन विकास पावरा आणि कंवल विकास पावरा आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे.तर दीड वर्षाची चिमुकली दुर्गा विकास पावरा ही थोडक्यात बचावली आहे.घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
एरंडोल तालुक्याच्या वरखेडी येथील एका शेतकऱ्याने शेतातील पिके वन्य प्राण्यांच्या तावडीतून सुटावे, यासाठी शेताभोवती लोखंडी तारेचे कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता.अश्यातच शेतावर जाणाऱ्या पावरा कुटुंबीयांना विद्युत प्रवाहाची कल्पना नव्हती.आज बुधवारी सकाळच्या सुमारास पावरा कुटुंब काही कामानिमित्त शेतावर जाण्यासाठी निघाले असता वीजप्रवाह सोडलेल्या तारेच्या कुंपणाला स्पर्श झाल्याबरोबर त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि क्षणातच पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच गावात मोठी खळबळ उडाली. स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.पोलिसांनी शेतमालकाला ताब्यात घेतले असून घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.पोलिसांकडून घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे.
- Advertisement -

