- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
जळगाव :-जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजण्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कालच्या मध्यरात्री भारताने मिशन ‘सिंदुर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले.त्यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी झाली आहे. युद्धजण्य परिस्थिती उद्भवल्याने आयुध निर्माणी कारखान्यात दारूगोटा साठा वाढविण्याचे केंद्र सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत.त्यानुसार आयुध निर्माणीतील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशातच आता जळगाव जिल्ह्यातील नंदीचे खेडगाव येथील सैनिक मनोज पाटील यांना तात्काळ सेवेत रुजू होण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.विशेष म्हणजे, मनोज पाटील यांचा नुकताच सोमवार ५ मे रोजी विवाह सोहळा पार पडला.देशात युद्धजण्य परिस्थिती असल्याने मनोज यांना त्वरेने बोलावण्यात आले आहे. यासाठी आज,गुरुवार ८ मे रोजी सीमेवर जाण्यासाठी रवाना झाले आहेत. लग्नासाठी सुट्टी घेऊन मनोज गावी परतला होता. पाचोरा येथे लग्न समारंभ पार पडत नाही,तोच सरकारने मनोज यांना कर्तव्याच्या ठिकाणी त्वरेने बोलावणे आले आहे.कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतांनाच कर्तव्यावर जावे लागल्याचा मनोजला गर्व आहे.देशसेवेपेक्षा मोठे काहीही नाही, अशा भावना मनोजने व्यक्त केली.तर त्यांची पत्नी यामिनी हिनेदेखील या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे म्हटले.
- Advertisement -

