Wednesday, April 15, 2026
Homeजळगांवतीन दिवसांपूर्वीच लग्न आणि आज सीमेवर जाण्यासाठी रवाना.. - देशसेवेपेक्षा मोठे काहीही...

तीन दिवसांपूर्वीच लग्न आणि आज सीमेवर जाण्यासाठी रवाना.. – देशसेवेपेक्षा मोठे काहीही नाही; नवविवाहिताचे उदगार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
जळगाव :-जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजण्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कालच्या मध्यरात्री भारताने मिशन ‘सिंदुर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले.त्यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी झाली आहे. युद्धजण्य परिस्थिती उद्भवल्याने आयुध निर्माणी कारखान्यात दारूगोटा साठा वाढविण्याचे केंद्र सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत.त्यानुसार आयुध निर्माणीतील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशातच आता जळगाव जिल्ह्यातील नंदीचे खेडगाव येथील सैनिक मनोज पाटील यांना तात्काळ सेवेत रुजू होण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.विशेष म्हणजे, मनोज पाटील यांचा नुकताच सोमवार ५ मे रोजी विवाह सोहळा पार पडला.देशात युद्धजण्य परिस्थिती असल्याने मनोज यांना त्वरेने बोलावण्यात आले आहे. यासाठी आज,गुरुवार ८ मे रोजी सीमेवर जाण्यासाठी रवाना झाले आहेत. लग्नासाठी सुट्टी घेऊन मनोज गावी परतला होता. पाचोरा येथे लग्न समारंभ पार पडत नाही,तोच सरकारने मनोज यांना कर्तव्याच्या ठिकाणी त्वरेने बोलावणे आले आहे.कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतांनाच कर्तव्यावर जावे लागल्याचा मनोजला गर्व आहे.देशसेवेपेक्षा मोठे काहीही नाही, अशा भावना मनोजने व्यक्त केली.तर त्यांची पत्नी यामिनी हिनेदेखील या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे म्हटले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!