Friday, July 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसुरक्षा दल-नक्षल चकमक.. पाच नक्षलवाद्यांचा खात्मा; २१४ तळ आणि बंकर उद्ध्वस्त..

सुरक्षा दल-नक्षल चकमक.. पाच नक्षलवाद्यांचा खात्मा; २१४ तळ आणि बंकर उद्ध्वस्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून जवानांनी नक्षलवाद्यांचे २१४ तळ आणि बंकर उद्ध्वस्त केले आहेत.त्याचबरोबर,जंगल परिसरातून ४५० आईडी(इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइस) म्हणजेच स्फोटक सामग्री,जी मोठ्या हमल्याकरीता वापरण्यात येणार होती व ८१८ बीजीएल शेल आणि ८९९ बंडल कोडेक्ससह मोठ्या प्रमाणावर डेटोनेटर जप्त करण्यात आले आहेत.सदरची कारवाई ही बिजापूरच्या करेगुट्टा क्षेत्रातील घनदाट जंगल परिसरात करण्यात आली.गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षलविरोधी विशेष मोहिमेत सुरक्षा दलांना बिजापूरच्या जंगल भागात नक्षलवाद्यांच्या हालचालींची गुप्त माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे जवानांनी शोधमोहीम सुरू केली. जवानांची चाहूल लागताच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अंदाधुंध गोळीबार सुरू केला.त्यास जवानांनी तात्काळ चोख प्रत्युत्तर दिले.यात पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.अद्याप मारल्या गेलेल्या पाच नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.परिसरात शोधमोहीम सुरू असून आणखी नक्षलवादी ठार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!