- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-शाळेत जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेली इयत्ता दहावीची विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना भिवापूर तालुक्याच्या थुटानबोरी (पुनर्वसन)येथे समोर आली आहे.जवळपास सात दिवस लोटले तरी तिचा थांगपत्ता लागलेला नसल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला आमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.
लक्ष्मण भय्याजी बोरसरे रा.थुटानबोरी(पुनर्वसन) यांची १५ वर्षीय मुलगी सलोनी ही जवळच्याच सालेभट्टी येथील प्रियवंदा विद्यालयात इयत्ता १० व्या वर्गात शिकते.ती गत १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती.मात्र,शाळा सुटल्यानंतरही सायंकाळपर्यंत ‘ती’ घरी परतली नाही.त्यामुळे चिंतातुर झालेल्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला.शोध घेऊनही सलोनीचा कुठेही पत्ता लागला नाही.अखेर वडील लक्ष्मण यांनी भिवापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. “माझी मुलगी स्वतःहून कोठेही निघून जाणारी नसून,कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले,” असा संशय तक्रारीत व्यक्त केला आहे.पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२)अन्वये गुन्हा दाखल करून,भिवापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांनी शोधकार्य सुरू केला आहे.
- Advertisement -

