उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली) :- दोन वर्षांपासून रखडलेल्या पाणी पुरवठा नळ योजनेचा बांधकामावेळी वार्ड क्र.१ मधील नालीची मोडतोड होत येथून सांड पाणी व पावसाच्या पाण्याचा निचरा होणे कठीण झाले आहे. याकडे वारंवार लक्ष वेधूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत संतप्त ग्रामसभेने काल,दिनांक-२५ जून रोजी घाटी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
मागील दोन वर्षांपासून नळ योजनेचे हे काम सुरू आहे.बांधकामा दरम्यान तुटलेल्या नालीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष झाल्याने या वार्डात ठिकठिकाणी सांडपाणी साचत दुर्गंधी निर्माण झाली आहे. पावसाळ्यात तर परीस्थीती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समिति मार्फत अनेकदा संबंधित कंत्राटदार व पाणी पुरवठा विभागाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र,याकडे सातत्याने दूर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत निषेध व्यक्त केला.

