गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील धानोरा-मुरूमगाव मार्गावर २० मे २००९ रोजी हत्तीगोटा पहाडीजवळ नक्षलवाद्यांनी रस्त्यावर झाडे तोडून मार्ग अडविल्याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दोन पोलिस अधिकारी व १४ जवान रवाना झाले असता त्यांना दीडशे ते दोनशे नक्षलवाद्यांनी घेरले होते.त्यामुळे सदरची माहिती ही मुरूमगाव पोलिस मदत केंद्राला प्राप्त होताच जाण्यासाठी निघालेल्या जवानांचा मार्ग नक्षल्यांनी येरकडजवळ जंगल परिसरात रस्त्यावर दगड टाकून अडविला होता.त्यामुळे मदत कार्य होऊ न शकल्याने नक्षलवाद्यांनी दोन पोलिस अधिकाऱ्यांसह १४ जवान शहीद झाले होते.अश्यातच नक्षलवाद्यांनी त्यांची शस्त्रेही पळवून नेली होती.प्रकरणी गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील गोडेली येथील रहिवासी बिरजू पित्तो पुंगाटी वय ३६ वर्षे यांस संशयित नक्षली म्हणून सदरच्या गुन्ह्यात २५ मे २०२२ अटक करण्यात आली होती.त्यानुसार प्रारंभी तो भंडारा व नंतर नागपूर येथील कारागृहात होता.संशयित नक्षली म्हणून प्रख्यात असलेला बिरजू पुंगाटी याचेवर विविध ५० गुन्हे दाखल असल्याने नुकतीच प्रकरणाची सुनावणी गडचिरोली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांच्यासमोर झाली.सरकारी पक्षाने एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले.साक्षीदार व इतर बायान नोंदीनुसार तब्बल १३ वर्षानंतर न्यायालयाने त्याची ४९ गुन्ह्यातून निर्दोष सुटका केली आहे.
संशयित नक्षलवाद्याची निर्दोष मुक्तता..!
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

