- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सरू केली.योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता वितरित करण्यात आला आहे; मात्र,राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता अद्याप जमा न झाल्याने होत असलेला विलंब शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ८ वा हप्ता जमा होईल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती; मात्र ती अद्याप फोल ठरू लागली आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत राज्य सरकार वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपये तीन हप्त्यात पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करते. योजनेतून अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे.मात्र,अद्याप अजूनही आठव्या हप्त्याची दोन हजार रुपये जमा करण्यात आले नसल्याने आणखी किती दिवस वाट पहावी?असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घर करून सोडत आहे.त्यातच,नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता नेमका कधी जमा होणार? असाही प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. दुसरीकडे,वाढती महागाई,खत-बियाण्यांचे दर,कर्जाचा बोजा आणि नैसर्गिक संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी अत्यंत महत्त्वाचा आहे.त्यामुळे हप्ता तातडीने जमा करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून जोर धरू लागली आहे.
- Advertisement -

