Sunday, April 19, 2026
Homeपुणेशेतकऱ्यांना जास्त दराने बियाणे व खतांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर दाखल होणार फौजदारी...

शेतकऱ्यांना जास्त दराने बियाणे व खतांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर दाखल होणार फौजदारी खटले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

पुणे :- चालू वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे व रासायनिक खते ही निश्चित करून दिलेल्या दरानुसारच उपलब्ध करून द्यावीत.बियाणांची आणि रासायनिक खतांची जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना जास्त दराने बियाणे व खतांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर प्रसंगी फौजदारी खटले भरण्याचा इशारा राज्याच्या कृषी विभागाने दिला आहे.

राज्यात यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात १ लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली आहे.यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बियाणे आणि रासायनिक खतांची गरज शेतकऱ्यांना लागणार आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील काही बी- बियाणे आणि खते विक्रेते हे जाणीवपूर्वक बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याचे राज्याच्या कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीच्या दराने बियाणे व खतांची खरेदी करावी लागत आहे.या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने हा इशारा दिला आहे.या वृत्ताला कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने बियाण्यांच्या व खतांच्या पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सध्याची बियाणांची एकूण मागणी ही १८ लाख क्विंटल इतकी आहे.मात्र क्षेत्रात वाढ झाल्यामुळे राज्याच्या कृषी विभागाने यंदा २४ लाख क्विंटल बियाणे मंजूर केले आहे.यापैकी आतापर्यंत १३ लाख क्विंटल वितरित करण्यात आले आहे. दरम्यान,कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी खरीप हंगाम पूर्व तयारीबाबतची आढावा बैठक घेतली. दरम्यान, राज्याच्या कृषी विभागाने बियाणे व खते यांचे गैरव्यवहार रोखून शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी काही कृषी कायदे प्रस्तावित केले आहेत.हे कायदे विधिमंडळाच्या विचारार्थ प्रलंबित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टास्क फोर्स स्थापन करणार दरम्यान, चालू वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे बियाणे योग्य भावात मिळावेत आणि रासायनिक खतांचा मुबलक साठा व त्याचे योग्य वितरण व्हावे, या उद्देशाने एक टास्क फोर्स स्थापन करण्याचा आदेश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाला दिला आहे. या आदेशानुसार कृषी विभागाच्या वतीने टास्क फोर्स स्थापन केले जाणार आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून खरीप हंगामातील बियाणे व खतांच्या उपलब्धतेबाबतची योग्य कार्यवाही करता येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!