Tuesday, June 23, 2026
Homeपुणेशेतकऱ्यांना जास्त दराने बियाणे व खतांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर दाखल होणार फौजदारी...

शेतकऱ्यांना जास्त दराने बियाणे व खतांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर दाखल होणार फौजदारी खटले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

पुणे :- चालू वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे व रासायनिक खते ही निश्चित करून दिलेल्या दरानुसारच उपलब्ध करून द्यावीत.बियाणांची आणि रासायनिक खतांची जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना जास्त दराने बियाणे व खतांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर प्रसंगी फौजदारी खटले भरण्याचा इशारा राज्याच्या कृषी विभागाने दिला आहे.

राज्यात यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात १ लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली आहे.यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बियाणे आणि रासायनिक खतांची गरज शेतकऱ्यांना लागणार आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील काही बी- बियाणे आणि खते विक्रेते हे जाणीवपूर्वक बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याचे राज्याच्या कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीच्या दराने बियाणे व खतांची खरेदी करावी लागत आहे.या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने हा इशारा दिला आहे.या वृत्ताला कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने बियाण्यांच्या व खतांच्या पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सध्याची बियाणांची एकूण मागणी ही १८ लाख क्विंटल इतकी आहे.मात्र क्षेत्रात वाढ झाल्यामुळे राज्याच्या कृषी विभागाने यंदा २४ लाख क्विंटल बियाणे मंजूर केले आहे.यापैकी आतापर्यंत १३ लाख क्विंटल वितरित करण्यात आले आहे. दरम्यान,कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी खरीप हंगाम पूर्व तयारीबाबतची आढावा बैठक घेतली. दरम्यान, राज्याच्या कृषी विभागाने बियाणे व खते यांचे गैरव्यवहार रोखून शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी काही कृषी कायदे प्रस्तावित केले आहेत.हे कायदे विधिमंडळाच्या विचारार्थ प्रलंबित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टास्क फोर्स स्थापन करणार दरम्यान, चालू वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे बियाणे योग्य भावात मिळावेत आणि रासायनिक खतांचा मुबलक साठा व त्याचे योग्य वितरण व्हावे, या उद्देशाने एक टास्क फोर्स स्थापन करण्याचा आदेश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाला दिला आहे. या आदेशानुसार कृषी विभागाच्या वतीने टास्क फोर्स स्थापन केले जाणार आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून खरीप हंगामातील बियाणे व खतांच्या उपलब्धतेबाबतची योग्य कार्यवाही करता येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!