- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-आई-वडील व दोन मुलांनी आत्महत्या केल्याने नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका हादरला आहे.पतसंस्थेतील गैरव्यवहाराच्या आरोपात अटकेमुळे बदनामी झाल्याने आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमधून स्पष्ट होत असल्याचे नरखेड पोलिसांचे म्हणणे आहे.एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
सेवानिवृत्त शिक्षक विजय मधुकर पचोरी वय ६८ वर्षे, पत्नी माला विजय पचोरी वय ५३ वर्षे,मुलगा गणेश विजय पचोरी वय ३८ व दीपक विजय पचोरी वय ३६ वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या चौघांची नावे आहेत. विजय पचोरी २०१६ मध्ये निवृत्त झाले होते.ते पत्नी व दोन मुले यांच्यासह गावातील ओमप्रकाश जानराव खोब्रागडे यांच्याकडे भाड्याने राहात होते.काल, सकाळी कुटुंबातील कुणीही उठले नसल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला.परंतु कुणीही बाहेर आले नाही.बराच वेळानंतरही कुणी बाहेर आले नसल्याने शेजाऱ्यांना शंका आली.त्यांनी दार हलवून बघितले तर चौघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.शेजाऱ्यांनी तत्काळ नरखेड पोलिसांना सूचना दिली. पोलिस तात्काळ पोहोचले.दार आतून बंद होते.पोलिसांनी दार उघडताच धक्का बसला. घरातील चौघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आले.तीन मृतदेहांचे हात बांधलेल्या अवस्थेत होते.पोलिसांनी सर्व मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला.गणेश विजय पचोरीच्या खिश्यात एक सुसाईड नोट आढळून आली आहे.
यावर चौघांच्याही स्वाक्षरी आहेत.गणेश विजय पचोरी हा पांढुर्णा येथील मातृसेवा इंडिया निधी लिमिटेड पतसंस्थेत संचालक होता.त्याच्यावर आर्थिक फसवणूक बद्दल गुन्हा दाखल आहे.त्याला १६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती.मागील ऑगस्ट महिन्यात त्याला जामीन मिळाला.या कारणाने आत्महत्या केली असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद आहे
- Advertisement -

