Tuesday, July 28, 2026
Homeदेसाईगंजशिवरायांची हिंदवी स्वराज्य संकल्पना धर्मनिरपेक्ष होती- माझी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांचे...

शिवरायांची हिंदवी स्वराज्य संकल्पना धर्मनिरपेक्ष होती- माझी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज  :-हिंदवी स्वराज्याची निर्मीती करतांना छञपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातिल लोकांना सोबत घेवुन रयतेच्या हिताचे रक्षण केले.शिवाजी महाराजांची स्वराज्य संकल्पना धर्मनिरपेक्ष होती.असे प्रतिपादन माजी कैबिनेट मंञी तथा ब्रम्हपुरी निर्वाचन क्षेञाचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.          देसाईगंज तालुक्यातिल कुरुड येथे काल १८ फेब्रुवारी ला नवतरुण युवक मंडळाच्या वतिने बळीराजा चौकातिल सुभाष वार्डात शिव जयंती महोत्सव निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात शिवचरिञ प्रबोधनकार कांचनताई शेळके यांच्या शिवकिर्तन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विचार व्यक्त करतांना विजय वडेट्टीवार म्हणाले की,देशात मोघलांनी सत्ता काबिज केल्यानंतर जुलमी राजसत्ता अस्तित्वात आली.या सत्तेत सर्वसामान्य जनतेवर अनेक कर आखुन मोघलांनी लुट मचवली होती. मोघलांवेतिरिक्त इतर धर्मियांना अपमानजनक वागणुक दिली जात होती.आपल्या मातित इतरांनी राज्य करणे हे जिजाऊंना मान्य न्हवते.यासाठी स्वराज्याचा पाया रचण्यासाठी जिजाऊंनी लहानवयातच शिवरायांवर स्वराज्य निर्मितिचे संस्कार रुजविले; स्वराज्याचा लढा उभारतांना शिवरायांनी जातिभेद व धर्मभेद ही संकल्पना स्पष्टपणे नाकारली. आपल्या सैन्यात सर्व जातिधर्मातिल मावळ्यांसह मुस्लिमांनाही मानाचे स्थान देवुन छञपती शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्ष पद्धतिने हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली.शिवरायांचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी दांभिक सत्तेचे मनसुबे हानुण पाडा;असे आवाहनही कार्यक्रमाप्रसंगी वडेट्टीवारांनी केले.

कार्यक्रमाला माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी,डॉ.नामदेव किरसान वामनराव सावसाकडे, परसराम टिकले,राजुभाऊ रासेकर,नितिन राऊत, मनोज ढोरे,नानाजी तुपट,हरिष मोटवानी,राजु बुल्ले, दिगांबर मेश्राम,प्रशाला गेडाम,संदिप वाघाडे,अरुण कुंभलवार,यांचेसह मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे आयोजन मनोज ढोरे यांचा वडेट्टीवार यांचे हस्ते शाल व श्रिफळ देवुन सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधुन घेण्यात आलेल्या  सामान्य ज्ञान परिक्षेत प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्ध्यार्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस देण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रदिप उरकुडे, गणेश भोयर,संदिप प्रधान,पियुष उरकुडे,अनिल चिंचोळकर,आदित्य मिसार यांचेसह नवतरुण युवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!