Tuesday, July 14, 2026
Homeदेसाईगंजविधानसभा निवडणुकीत अनेकांची मौज... उद्योगाविना देसाईगंजसह कुरखेडा,आरमोरी,कोरची तालुक्यात बेरोजगारांची फौज...

विधानसभा निवडणुकीत अनेकांची मौज… उद्योगाविना देसाईगंजसह कुरखेडा,आरमोरी,कोरची तालुक्यात बेरोजगारांची फौज…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):- ‘गडचिरोली जिल्हा अन् खादाळावर भिल्ला’ अशी स्थिती जिल्ह्याच्या देसाईगंज,कुरखेडा,आरमोरी,कोरची व इतर तालुक्यांची झाली आहे.सध्या स्थितीत विधानसभा निवडणुकांचा डमरू सुरू आहे.अशातच अनेकांची निवडणुकीत मौज तर उद्योगाविना देसाईगंजसह कुरखेडा,आरमोरी,कोरची तालुक्यात बेरोजगारांची फौज तयार झाली आहे.उद्योगाविना तरुण मंडळी अवैध धंद्यांकडे वळलेली दिसून येत आहेत.त्यातच पाहिजे त्या प्रमाणात हाताला काम मिळत नसल्याने अवैध धंद्यांना ऊत येण्याचे महत्वाचे कारण ठरू लागले आहे.
व्यापाराची जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेला देसाईगंज तालुका उद्योग विरहित आहे.या तालुक्याला लागून चंद्रपूर,भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत; असे असतांना देखील इथे रोजगार मिळवून देण्यासाठी म्हणून उद्योग आणण्यात राजकारण्यांना सपशेल अपयश आल्याचे चित्र आहे.यामुळे उद्योगाविना चारही तालुक्यात दिवसेंदिवस बेरोजगारांची ‘फौज’ वाढत असून हे सुशिक्षित बेरोजगार आता निवडणुकीचा हंगाम पाहून चांगलीच ‘मौज’ लूटतांना दिसत आहेत.
देसाईगंज तालुका उद्योगविरहीत आहे.या तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय आहे.शेतीच्या भरवंशावर येथील नागरिक आपली उपजीविका करतात. तालुक्यात एकही उद्योग नसल्यामुळे रोजगाराविना सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.कुरखेडा येथे औद्योगिक विकास महामंडळासाठी जागा शासनाने औद्योगिक प्रयोजनार्थ अधिग्रहित केली.मात्र,अद्यापही कुरखेडा शहरात एकही उद्योग उभा राहिला नाही.एकंदरित तालुक्यात उद्योग आणण्यात राजकारण्यांना सपशेल अपयश आले.उद्योग आणण्यास राजकारणी अपयशी ठरल्याचे बोलले जाते.परिणामी आरमोरी विधानसभेअंतर्गत येणाऱ्या चारही तालुक्यांना नेहमीच पोरकेपणाची वागणूक दिल्याची चर्चा अधून मधून डोके काढत असते.उद्योगविरहित चारही तालुक्याची भिस्त शेतीवर आहे.शेती,शेतमजुरी आणि रोजंदारीच्या कामावर येथील नागरिक आपली गुजरान करतात.शेतीचा हंगाम आटोपला की तालुक्यातील बहुतांश मंडळी रोजगारासाठी परप्रांतात धाव घेतात. चारही तालुक्यात एक ना अनेक समस्या आजही आवासून उभ्या आहेत.बेरोजगारीसह तालुक्यात सिंचनाचे प्रश्न अजूनही कायम आहेत.विधानसभेच्या निवडणुका आल्या की करंजीच्या बिया वाटल्या जातात.एकदाची निवडणूक गेली की या सारे रान मोकळे होऊन पहच्यान कोण? अशी बगल दिली जाते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!