Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजविधानसभा निवडणुकीत अनेकांची मौज... उद्योगाविना देसाईगंजसह कुरखेडा,आरमोरी,कोरची तालुक्यात बेरोजगारांची फौज...

विधानसभा निवडणुकीत अनेकांची मौज… उद्योगाविना देसाईगंजसह कुरखेडा,आरमोरी,कोरची तालुक्यात बेरोजगारांची फौज…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):- ‘गडचिरोली जिल्हा अन् खादाळावर भिल्ला’ अशी स्थिती जिल्ह्याच्या देसाईगंज,कुरखेडा,आरमोरी,कोरची व इतर तालुक्यांची झाली आहे.सध्या स्थितीत विधानसभा निवडणुकांचा डमरू सुरू आहे.अशातच अनेकांची निवडणुकीत मौज तर उद्योगाविना देसाईगंजसह कुरखेडा,आरमोरी,कोरची तालुक्यात बेरोजगारांची फौज तयार झाली आहे.उद्योगाविना तरुण मंडळी अवैध धंद्यांकडे वळलेली दिसून येत आहेत.त्यातच पाहिजे त्या प्रमाणात हाताला काम मिळत नसल्याने अवैध धंद्यांना ऊत येण्याचे महत्वाचे कारण ठरू लागले आहे.
व्यापाराची जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेला देसाईगंज तालुका उद्योग विरहित आहे.या तालुक्याला लागून चंद्रपूर,भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत; असे असतांना देखील इथे रोजगार मिळवून देण्यासाठी म्हणून उद्योग आणण्यात राजकारण्यांना सपशेल अपयश आल्याचे चित्र आहे.यामुळे उद्योगाविना चारही तालुक्यात दिवसेंदिवस बेरोजगारांची ‘फौज’ वाढत असून हे सुशिक्षित बेरोजगार आता निवडणुकीचा हंगाम पाहून चांगलीच ‘मौज’ लूटतांना दिसत आहेत.
देसाईगंज तालुका उद्योगविरहीत आहे.या तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय आहे.शेतीच्या भरवंशावर येथील नागरिक आपली उपजीविका करतात. तालुक्यात एकही उद्योग नसल्यामुळे रोजगाराविना सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.कुरखेडा येथे औद्योगिक विकास महामंडळासाठी जागा शासनाने औद्योगिक प्रयोजनार्थ अधिग्रहित केली.मात्र,अद्यापही कुरखेडा शहरात एकही उद्योग उभा राहिला नाही.एकंदरित तालुक्यात उद्योग आणण्यात राजकारण्यांना सपशेल अपयश आले.उद्योग आणण्यास राजकारणी अपयशी ठरल्याचे बोलले जाते.परिणामी आरमोरी विधानसभेअंतर्गत येणाऱ्या चारही तालुक्यांना नेहमीच पोरकेपणाची वागणूक दिल्याची चर्चा अधून मधून डोके काढत असते.उद्योगविरहित चारही तालुक्याची भिस्त शेतीवर आहे.शेती,शेतमजुरी आणि रोजंदारीच्या कामावर येथील नागरिक आपली गुजरान करतात.शेतीचा हंगाम आटोपला की तालुक्यातील बहुतांश मंडळी रोजगारासाठी परप्रांतात धाव घेतात. चारही तालुक्यात एक ना अनेक समस्या आजही आवासून उभ्या आहेत.बेरोजगारीसह तालुक्यात सिंचनाचे प्रश्न अजूनही कायम आहेत.विधानसभेच्या निवडणुका आल्या की करंजीच्या बिया वाटल्या जातात.एकदाची निवडणूक गेली की या सारे रान मोकळे होऊन पहच्यान कोण? अशी बगल दिली जाते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!