- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पावसाचा जोर कमी झाला असला तरीही राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागात मोठा पाऊस पडल्याने नदी,नाले दुथडी भरुन वाहू लागले होते.त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.अशातच आता पुन्हा राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वादळी पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार,चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया,नागपूर, बीड,हिंगोली,यवतमाळ,परभणी,छत्रपती संभाजीनगर, नांदेड,लातूर आणि धाराशिव या बारा जिल्ह्यांना पावसाच्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.अश्यातच कोकणातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ,सोसाट्याचा वारा (३०ते ४० किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ,सोसाट्याचा वारा (४० ते ५० किमी प्रतितास वेग)आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्यामुळे विजांचे कडकडाट व सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसापासून बचाव करण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
- Advertisement -

