- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात येत्या काही कालावधीत होऊ घातलेला जेएसडब्ल्यू स्टील प्लांट इतरत्र हलवण्यासंदर्भात तालुक्यातील कुरूड, कोंढाळा,तुळशी,कोकडी,शिवराजपुर,उसेगाव,नैनपुर येथील हजारो शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात भाजपाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते काल,शुक्रवार ६ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले.
देसाईगंज तालुका हा सर्वगुण संपन्न तालुका आहे. येथील सर्वसामान्य लोकं हे शेतीवर अवलंबून आहेत. अशातच येत्या काळात जेएसडब्ल्यू स्टील प्लांट उभा करण्यास जवळपास हजारो हेक्टर क्षेत्रातील शेतीचे अधिग्रहण केले जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला जाऊ शकतो.तालुक्यात इटियाडोह विभागाच्या वतीने शेतीसाठी सिंचनाची सोय उपलब्ध आहे.यामुळे दुबार पीक घेतले जाते.त्याचबरोबर शेतीसह गावठाण असलेली गावे प्लांट साठी उठवली जाऊ शकतात. त्यामुळे परिसरातील लोकं बेघर झाल्याशिवाय राहणार नाही.सदरची बाब ही देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांच्या लक्षात येताच त्यांनी परिसरातील कुरूड,कोंढाळा,तुळशी,कोकडी,शिवराजपुर,उसेगाव,नैनपुर येथील शेतकऱ्यांशी तसेच नागरिकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली दौरा असण्यापूर्वी देसाईगंज तालुक्यात होऊ घातलेला जेएसडब्ल्यू स्टील प्लांट इतरत्र हलवण्यासंदर्भात काय करता येणार,याबाबत अथक परिश्रम घेतले.त्यानुसार परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन तयार करून माजी आमदार कृष्ण गजबे यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गडचिरोली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करीत संवाद साधण्यात आला.प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पासाठी सुपीक जमिनी कोणत्याही परिस्थितीत देणार नाही व पर्यायी जागा शोधण्यात येईल,असे आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी,नरेश विठ्ठलानी,शंकर पारधी ग्रामपंचायत सदस्य कुरुड,अरुण राऊत माजी ग्रामपंचायत सदस्य कुरुड,सामाजिक कार्यकर्ते रोशन ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
- Advertisement -

