Friday, July 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी; ई-केवायसीसाठी उरले केवळ दहा दिवस..

लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी; ई-केवायसीसाठी उरले केवळ दहा दिवस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करतांना चुका केल्या होत्या.विशेष म्हणजे,आता लाडकी बहीण योजनेत फक्त ई-केवायसी केलेल्या महिलांनाच लाभ दिला जात आहे.ज्यांची ई-केवायसी करतांना चुक झाली; अश्यांना दुरुस्ती करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे.लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीत दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.दरम्यान,याबाबत अनेक अफवा परसवल्या जात आहेत.ई-केवायसी करण्याची मुदत संपली असल्याची बातमी सध्या व्हायरल होत आहे.यावर आता स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे.आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना कोणत्याही तथ्यहीन बातमीवर विश्वास न ठेवण्यास सांगितले आहे.त्यांनी म्हटले की,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या कपातीबाबत काही माध्यमांकडून प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या व तथ्यहीन आहेत.ई-केवायसी करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू असून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.या संदर्भात कोणतेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी माध्यमांनी तथ्यांची पडताळणी करावी ही नम्र विनंती, असे त्यांनी यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर  स्पष्ट केले आहे. यामुळे लाडक्या बहिणींच्या मनातील संभ्रम दूर झाला आहे.ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च असल्याने ई-केवायसीसाठी केवळ दहा दिवस उरले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!