- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-लाडकी बहीण योजने अंतर्गत गैरफायदा घेणाऱ्यांची पडताळणी करण्यात आली असून यात तब्बल १ हजार १८३ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी निकषात बसत नसतांनाही लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.विशेष म्हणजे,२० पुरुष कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याने सर्वांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.महिला व बालकल्याण विभागाने यादीची पडताळणी केल्यानंतर सदरची बाब पुढे आली आहे.१ हजार १८३ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये बहुतांश अंगणवाडी सेविका यांचाही समावेश आहे.योजनेचा लाभ घेतलेले सर्वाधिक कर्मचारी बुलढाणा जिल्ह्यात १९३,सोलापूर जिल्ह्यात १५०,लातूर जिल्ह्यात १४७,बीड जिल्ह्यात १४५ तर धाराशिव जिल्ह्यात ११० कर्मचारी आढळले.इतर जिल्ह्यात जसे की,जालना जिल्ह्यात ७६,वाशीम जिल्ह्यात ५६,तर पुणे जिल्ह्यात ५४ कर्मचारी आढळलेत.तर काही जिल्ह्यांत,जसे की रत्नागिरी, अकोला आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात केवळ एका कर्मचाऱ्याने गैरफायदा घेतला.गैरप्रकारात बहुतांश कर्मचारी अंगणवाडी सेविका असून ज्यांच्यावर योजनेच्या नोंदणीची जबाबदारी होती.या सेविकांनी स्वतःची नावे यादीत समाविष्ट करून योजनेचा गैरवापर केला.यामुळे नोंदणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत,कारण ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांनीच नियमांचे उल्लंघन केले.ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या कर्मचाऱ्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिलेले असून सदरची कारवाई महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार होणार आहे.यामध्ये निलंबन किंवा अन्य शिस्तभंगाच्या कारवाया समाविष्ट असू शकतात.
- Advertisement -

