- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज,बुधवार २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले.यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत,असे सामान्य प्रशासन विभाग(राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे.या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो,त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल.तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत.राष्ट्रीय किंवा प्रशासकीय दुखवट्याच्या काळात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जातो.मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या निधनानंतर प्रशासकीय दुखवटा जाहीर केल्यानंतर मंत्रालयासहीत सर्वच शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत.याला हाफ मास्ट असे म्हणतात.निधन झालेल्या व्यक्तीचे शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार केले जातात. यासंदर्भातील आदेशही जारी करण्यात आला असून अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या,गुरुवार २९ जानेवारी रोजी बारामतीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.काही राज्यांमध्ये अंत्यसंस्काराच्या दिवशी सुट्टी जाहीर केली जाते तर काही राज्यांमध्ये ज्या दिवशी अशा मान्यवर व्यक्तीचे निधन झाले आहे त्या दिवशी प्रशासकीय सुट्टी जाहीर केली जाते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हणजेच २८ जानेवारी रोजी प्रशासकीय सुट्टी जाहीर केली असली तरी पुढील दोन दिवसांसंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नसल्याने सरकारी कार्यालये आणि शाळा सामान्यपणे सुरु राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
- Advertisement -

