Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्यात तीन दिवस शासकीय दुखवटा जाहीर; पण उद्याला सुट्टी असणार की नाही?...

राज्यात तीन दिवस शासकीय दुखवटा जाहीर; पण उद्याला सुट्टी असणार की नाही? जाणून घ्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज,बुधवार २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले.यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत,असे सामान्य प्रशासन विभाग(राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे.या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो,त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल.तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत.राष्ट्रीय किंवा प्रशासकीय दुखवट्याच्या काळात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जातो.मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या निधनानंतर प्रशासकीय दुखवटा जाहीर केल्यानंतर मंत्रालयासहीत सर्वच शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत.याला हाफ मास्ट असे म्हणतात.निधन झालेल्या व्यक्तीचे शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार केले जातात. यासंदर्भातील आदेशही जारी करण्यात आला असून अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या,गुरुवार २९ जानेवारी रोजी बारामतीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.काही राज्यांमध्ये अंत्यसंस्काराच्या दिवशी सुट्टी जाहीर केली जाते तर काही राज्यांमध्ये ज्या दिवशी अशा मान्यवर व्यक्तीचे निधन झाले आहे त्या दिवशी प्रशासकीय सुट्टी जाहीर केली जाते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हणजेच २८ जानेवारी रोजी प्रशासकीय सुट्टी जाहीर केली असली तरी पुढील दोन दिवसांसंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नसल्याने सरकारी कार्यालये आणि शाळा सामान्यपणे सुरु राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!