Saturday, May 23, 2026
Homeचंद्रपूरमोहफुले वेचण्यासाठी गेला; तो घरी परतलाच नाही.. - आज छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला...

मोहफुले वेचण्यासाठी गेला; तो घरी परतलाच नाही.. – आज छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या विविध भागात वाघांची दहशत कायम असल्याचे चित्र आहे.मानवाची किंमत ही केवळ पैश्यापुरतीच उरलेली की काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.वाघ हल्ला करतो,एखाद्याचा जीव घेतो अन् कुटुंबीयांना लाखो रुपये देऊन सरली कथा.अश्याच कथेप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभिड तालुक्यातील मिंथुर गाव नजीकच्या शेतशिवारात मोहफुले वेचण्यासाठी गेलेला शेतमजूर वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज,रविवार ५ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.हरिदास महादेव कुबडे वय ५८ वर्षे,रा.मिंथुर, ता.नागभिड,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतमजुराचे नाव आहे.
शेतकरी हरिदास कुबळे हे नेहमीप्रमाणे काल शनिवारच्या सकाळी शेतपरिसरात असलेल्या मोहाच्या झाडाची फुले वेचण्यासाठी शेतावर गेले होते.सायंकाळ होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधमोहीम राबवली.दरम्यान, मृतक यांचा पुतण्या अक्षय कुबडे शेतात गेला असता त्याला दोन वाघ आणि तीन बछडे दिसून आले.सदरचे दृश्य पाहून अक्षयच्या मनात धडकी भरली आणि त्याच पावली परत जात गावात सदरची माहिती दिली.लागलीच वन विभागास पाचारण करण्यात आले.वनविभागाच्या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली.मात्र,हरिदास यांचा कुठेही थांगपत्ता लागलेला नसल्याने परत आज रविवारच्या सकाळी शेतशिवारात शोधमोहीम राबवली असता हरिदास कुबडे यांचा शेतात छिन्न-विच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला.घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.घटनेने परिसरात धास्ती निर्माण झाली असून वाघांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!