Tuesday, July 7, 2026
Homeमुंबई मोठी बातमी...आसाराम बापू बलात्कार प्रकरणी दोषी; न्यायालय सूनवणार उद्याला शिक्षा

 मोठी बातमी…आसाराम बापू बलात्कार प्रकरणी दोषी; न्यायालय सूनवणार उद्याला शिक्षा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- आसाराम बापूंच्या अडचणीत वाढ होणार आहे.२०१३ सालच्या बलात्कार प्रकरणात त्यांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले असून उद्या त्यांची शिक्षा जाहीर होणार आहे.बलात्कार प्रकरणात न्यायालयाने अन्य आरोपींना निर्दोष ठरवले आहे.मात्र आसाराम बापूंना न्यायालयाने दोशी ठरवले आहे. 

आसाराम बापूवर २०१३ मध्ये सुरतच्या एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता.तर नारायण साईवर याच पीडितेच्या लहान बहिणीवर बलात्कार केल्याचा आरोप होता.या प्रकरणात आसाराम व्यतिरिक्त त्याची पत्नी लक्ष्मी,मुलगी भारती आणि चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला,जस्सी आणि मीरा आरोपी आहेत.आसारामला न्यायालयात हजर करण्यात आले.सुनावणीनंतर कोर्टाने आसारामला दोषी ठरवले पण शिक्षेची घोषणा केली नाही.शिक्षेबाबत उद्या निर्णय दिला जाईल; असे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!