उद्रेक न्युज वृत्त
प्रा.मुनिश्वर बोरकर/ गडचिरोली
गडचिरोली :- नुकत्याच पार पडलेल्या मध्य प्रदेश मधील विधान सभेच्या निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टीचे उमेदवार तुलेश्वर सिंह मरकाम हे आरी या चिन्हावर पाली तानाखार विधान सभा मतदार संघातून विजयी झाले आहेत.त्यांच्या विजयाचा आनंद उत्सव गडचिरोली येथील गोंगपाच्या कार्यकर्त्यां मध्ये संचारला असुन गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी गोंगपाकडे लक्ष देण्याची गरज आहे; असे गोंगपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत शामकांत मडावी यांनी म्हटले आहे.
तुलेश्वर मरकाम यांनी कांग्रेसचे उमेदवार दुलेश्वरा सिदार हिला सात हजार मतांनी मागे टाकले आहे. अख्ख्या मध्य प्रदेशात बिजेपीची सत्ता आली परंतू तानाखार विधान सभा क्षेत्रात गोंगपाच्या मरकाम ने बिजेपीचे उमेदवार रामदयाल उईके यांना तिसर्या क्रमांकावर फेकले.मध्य प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी (मायावती ) व गोंगपाची युती होती यात दोन्ही पक्ष मिळून शंभर जागावर आपापले उमदेवराव उभे केले होते.गोंगपाचे विजयी उमेदवार तुलेश्वर मरकाम यांच्या विजयाचा आनंद उत्साव गोंगपाचे प्रदेश अध्यक्ष हरिष मडावी नागपूर,गोंगपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी,सचिव अंताराम पदा,वरिष्ठ नेते प्रा.रमेश कोरचा,साईनाथ कोडाप,किशोर मातलामी,महेंद्र सडमाके,मालता पुडो,प्रमिला कोडवते सहीत गडचिरोली जिल्ह्यातील गोंगपाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

