उद्रेक न्युज वृत्त :- तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांना काँग्रेस नेते तथा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार रेवंथ रेड्डी यांची भेट घेणे चांगलेच महागात पडले आहे.आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.एएनआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांच्यावर निवडणूक आयोगाने निलंबनाची कारवाई केली आहे.आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी आपण ही कारवाई करत असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.आज सकाळी निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांनी काँग्रेस नेते तथा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार रेवंथ रेड्डी यांची भेट घेतली होती.

