- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या दोन तरुण मामे-आते बहिणींचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील नागपूर-भंडारा महामार्गावरील महालगावनजीक असलेल्या नाग नदीच्या पुलावर घडली.अलिशा अनिकेत मेहर २६ वर्षे,रा.भुगाव, ता.कामठी,जि.नागपूर आणि तिची मामे बहीण मोनाली दिनेश्वर घाटोळे वय २७ वर्षे,रा.तायगाव खैरी,ता.सौसर, जि.पांढुरना,मध्यप्रदेश असे अपघातात मृत पावलेल्या महिलांची नावे असून त्या दोघी काल शनिवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास एमएच ४० बीएम २९५५ क्रमांकाच्या ॲक्टिव्हा गाडीने भुगाव येथे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जात होत्या.अश्यातच महालगावजवळील नाग नदीच्या पुलावर मागून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की,दोघीही गंभीर जखमी झाल्या.या अपघातात अलिशा मेहर यांचा जागीच मृत्यू झाला.तर मोनाली घाटोळे ह्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी नागपूर येथे नेत असतांना वाटेतच त्यांनी प्राण सोडला. अलिशा या मूळच्या पिपळा डाक बंगला येथील रहिवासी असून सात महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.तर मोनाली हिचा येत्या,२६ फेब्रुवारी २०२६ ला विवाह निश्चित झाला होता.लग्नाची खरेदी आणि तयारी सुरू असतांनाच काळाने झडप घातल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
- Advertisement -

