Monday, August 31, 2026
Homeनागपूरभीषण अपघातात मामे-आते बहीण असलेल्या दोन तरुण महिलांचा दुर्दैवी मृत्यू..!

भीषण अपघातात मामे-आते बहीण असलेल्या दोन तरुण महिलांचा दुर्दैवी मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या दोन तरुण मामे-आते बहिणींचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील नागपूर-भंडारा महामार्गावरील महालगावनजीक असलेल्या नाग नदीच्या पुलावर घडली.अलिशा अनिकेत मेहर २६ वर्षे,रा.भुगाव, ता.कामठी,जि.नागपूर आणि तिची मामे बहीण मोनाली दिनेश्वर घाटोळे वय २७ वर्षे,रा.तायगाव खैरी,ता.सौसर, जि.पांढुरना,मध्यप्रदेश असे अपघातात मृत पावलेल्या महिलांची नावे असून त्या दोघी काल शनिवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास एमएच ४० बीएम २९५५ क्रमांकाच्या ॲक्टिव्हा गाडीने भुगाव येथे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जात होत्या.अश्यातच महालगावजवळील नाग नदीच्या पुलावर मागून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की,दोघीही गंभीर जखमी झाल्या.या अपघातात अलिशा मेहर यांचा जागीच मृत्यू झाला.तर मोनाली घाटोळे ह्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी नागपूर येथे नेत असतांना वाटेतच त्यांनी प्राण सोडला. अलिशा या मूळच्या पिपळा डाक बंगला येथील रहिवासी असून सात महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.तर मोनाली हिचा येत्या,२६ फेब्रुवारी २०२६ ला विवाह निश्चित झाला होता.लग्नाची खरेदी आणि तयारी सुरू असतांनाच काळाने झडप घातल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!