- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-अनेकजण पैश्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात.त्यात दिलेले पैसे दुप्पट होणार म्हटले की, अनेकांना मोठी हाव सुटत असते खरी,पण तीच हाव एक दिवस घातक ठरत असते.असाच काहीसा प्रकार नागपूरच्या मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेला असून पैसे दुप्पट होण्याच्या आमिषाचे तब्बल १५ जण बळी पडले आहेत.चार आरोपींनी मिळून तब्बल २८ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.अशोककुमार सिरोटिया वय ५४ वर्षे,रा.कोहळे ले आऊट,खडगाव रोड,वाडी,धीरज अर्जुन पाल वय ४० वर्षे,रा.महादेवनगर,लाव्हा, वाडी,प्रकाशचंद जैन (जयपूर) व रवी जैन (जयपूर)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.तर ४६ वर्षीय खुशाल टीकाराम चवडे रा.रजत एन्क्लेव्ह, झिंगाबाई टाकळी असे तक्रारदाराचे नाव आहे.
तक्रारदार खुशाल यांची २०२२ मध्ये आरोपींशी ओळख झाली होती.आरोपींनी ‘माय व्हिक्टरी क्लब प्रा. लि.’ नामक कंपनी असून या कंपनीत गुंतवणूक करा आणि काही दिवसांतच पैसे दुप्पट मिळवा,असा दावा आरोपींनी केला होता.त्यांच्यावर विश्वास ठेवून खुशाल यांनी पैसे गुंतविले होते.खुशाल यांच्यासोबत आणखी १४ जणांकडून आरोपींनी डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ३१ लाख ७० हजार रुपये घेतले. आरोपींनी परतावा म्हणून ३ लाख ६१ हजार रुपये परत केले.मात्र,त्यानंतर कुठलाही नफा किंवा परतावा दिला नाही.खुशाल व इतर गुंतवणूकदारांनी पैशांची मागणी केली असता आरोपींनी टाळाटाळ केली.नंतर संपर्कच तोडला. अखेर २८ लाख ८ हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणात खुशाल यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी चारही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपींनी अश्या प्रकारे आणखी लोकांना गंडा घातल्याचा पोलिसांना संशय आहे.कुणाचे पैसे आरोपींनी बुडविले असतील तर कागदपत्रांसह त्वरित संपर्क साधावा,असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीश काळसेकर यांनी केले आहे.
- Advertisement -

