- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-एकीकडे वृक्ष लागवडीच्या नावावर मोठा गाजावाजा केला जातो,तर दुसरीकडे पर्यावरणाची ऐशी-तैशी केली जाणार असल्याचा प्रकार नुकताच गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस येऊ लागला आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखनिज शुद्धीकरण प्रकल्पासाठी लॉयड्स कंपनीला गडचिरोलीतील तब्बल ९०० हेक्टर जंगलावर कुऱ्हाड चालवण्यास आणि एक लाखाहून अधिक झाडांची कत्तल करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली असल्याचे वृत्त ‘दैनिक सामना’ ने प्रसारित केले आहे.
दिलेल्या वृत्तानुसार,केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ञ समितीने लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीसाठी सुरजागडच्या खाणीतील लोहखनिजाचे उत्पादन दुपटीने अधिक करण्याची शिफारस केली आहे.सध्या लोहखनिजाचे उत्पादन वार्षिक १० दशलक्ष टन इतके असून ते वार्षिक २६ दशलक्ष टनवर नेण्याची शिफारस तज्ञांच्या समितीने केली आहे.याच प्रकल्पासाठी केंद्र सरकारने लॉयड्स कंपनीला ९०० हेक्टर म्हणजेच तब्बल २ हजार २५० एकरवरील जंगलाची वाट लावण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे दिसून येत आहे.गडचिरोली जिल्ह्यातील जमीन,जंगले आणि नद्या आदिवासी समुदायाच्या जीवनाचा आधार आहेत.ही नैसर्गिक संसाधने स्टील उत्पादनाच्या नावाखाली नष्ट केली जात आहेत.यामुळे पर्यावरणीय असंतुलन निर्माण होण्याबरोबरच आदिवासी समाजाचे विस्थापन होईल.
- Advertisement -

