Thursday, April 16, 2026
Homeनागपूरनववर्षाच्या पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांड; पोटच्या मुलाने आई-वडिलांना संपविले...

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांड; पोटच्या मुलाने आई-वडिलांना संपविले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपुरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्यांतर्गत दुहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.पोटच्या मुलाने स्वतःच्या आई-वडिलांचीच निर्घुणपणे हत्या करीत घटनेनंतर त्याने पोलीस आणि नातेवाईकांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.आई-वडिलांची हत्या नाही तर आत्महत्या असल्याचा सुरुवातीला त्याने बनाव केला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली.
नात्याला काळिमा फासणारी घटना नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खसाळा परिसरात घडली.लिलाधर डाखोळे आणि अरुणा डाखोळे असे आई-वडिलांचे नाव असून आरोपी मुलाचे नाव उत्कर्ष डाखोळे आहे.लिलाधर हे खापरखेडा येथे महाजेनकोमध्ये टेक्निशियन म्हणून काम करतात तर अरुणा विनोबा भावे नगर येथील एका खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षिका होत्या.आरोपी उत्कर्ष हा ६ वर्षांपासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता.मात्र,वारंवार नापास होत असल्याने उत्कर्षच्या कानशि‍लात लगावली होती.तर दोघेही त्याला अभ्यास सोडून शेती कर असे म्हणायचे.पण उत्कर्ष अभियांत्रिकी पूर्ण करण्याच्या त्याच्या निर्णयावर ठाम होता.उत्कर्षला एमडीचे(नशा येणारे द्रव्य) व्यसन होते.या व्यसनामुळे त्याला अभ्यास करता आला नाही.आई-वडिलांच्या सततच्या बोलण्यामुळे तो चिडला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या आई-वडिलांची हत्या करण्याचा निर्णय घेतला.
उत्कर्षने २६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी त्याची लहान बहीण सेजल हिला कॉलेजला सोडले.सेजल वर्धा रोडवर असलेल्या महाविद्यालयात बीएएमएसचे शिक्षण घेते.तिला कॉलेजमध्ये सोडल्यानंतर उत्कर्ष त्याच्या घरी पोहोचला,तिथे १ वाजण्याच्या सुमारास त्याने सर्वप्रथम त्याची आई अरुणा हिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर आरोपी उत्कर्ष आपल्या वडिलांची घरी येण्याची वाट पाहू लागला.सायंकाळी वडील आपल्या ड्युटीवरून घरी पोहोचल्यावर त्याने लगेचच वडिलांवर धारदार चाकूने वार करून त्यांचीही हत्या केली.या हत्येच्या घटनेनंतर आरोपीने घराला कुलूप लावून वडिलांची गाडी आणि मोबाईल फोन कोराडी येथे राहणाऱ्या त्याच्या काकाकडे गेला.तेथून त्याने आपल्या बहिणीला फोन केला आणि त्यांचे आई-वडील काही दिवस मेडिटेशनसाठी बेंगळुरूला गेले असून तेथे त्यांना मोबाइल बंद ठेवावे लागणार असल्याची खोटी माहिती दिली.
हत्येचे रहस्य उघड होऊ नये म्हणून त्याने आपल्या बहिणीला वडिलांच्या गाडीतून कॉलेजमध्ये नेऊन सोडण्यास सुरुवात केली.मात्र,दिखावा करण्यासाठी उत्कर्ष मंगळवारी रात्री त्यांच्या घरी आला आणि त्याने जोरात दरवाजा ठोठावण्याचा बहाणा केला.त्यानंतर तो पुन्हा काकांकडे गेला.हा प्रकार उघडकीस येणार म्हणून त्याने वडिलांच्या मोबाइलवर ‘सुसाईड नोट’ टाईप केली.त्याचा स्क्रिन शॉट घेत तो फोटो वडिलांच्या मोबाइलचा स्किन सेव्हर म्हणून त्याने ठेवला. ‘आमच्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नसून,त्यासाठी मुलांना त्रास देऊ नका,आमच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणीसुद्धा करू नका,आम्हाला थेट स्मशानात न्या,’ असे त्याने या नोटमध्ये लिहून ठेवले होते.दोघांचे मृतदेह कुजल्याने त्यांचा वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.
तपासादरम्यानच हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता,त्याने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. आपण आईचा गळा दाबून व वडिलांवर चाकूने हल्ला करीत त्यांची हत्या केल्याचे त्याने मान्य केले.आपण इतके चिडलो होतो की वडिलांवर चाकूने नेमके किती वार केले हे आपल्याला आठवत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी उत्कर्षला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!