उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- सध्याच्या घडीला वा यापूर्वीही देसाईगंज शहर तसेच ग्रामीण भागातील क्षेत्रात नवनवीन कार्यकर्ते वा प्रशासकीय बाबी हाताळणारे कितीतरी झण आले व अती उताविळपणा दिसून आल्याने हकालपट्टी होऊन निघून गेलेत; मात्र ज्याला याबाबत अजूनही कळलेले नाही; असा नवख्या आला अन् अति शहाणपणा करून निघून गेला असल्याने अश्या व्यक्तीबाबत “असणार क्षेत्रात तर भेटणार नक्षत्रात” अशी चर्चा जिकडे-तिकडे वाऱ्या सारखी पसरू लागली असल्याने एखाद्या नक्षत्रात कार्य करणारा ‘तो’ व्यक्ती कोण? असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जातो आहे.
महत्वाचे म्हणजे देसाईगंज तालुक्यात कितीतरी बोलबाला करणारे प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी होऊन गेलेत; अनेकजण भूमिगत होण्यापूर्वी टक्केवारी घेऊन गेलेत; मात्र मेरी सूनो म्हणणारे जास्त काळ तग धरून न राहता पूर्ण विराम तसेच हल्ली आराम करीत आहेत.कधीही कुणाला कमी लेखू नये; सर्वच जण आपापल्या परीने बरोबरी करण्याचा प्रयत्न करीत असतात.गर्वाचे घर खाली व्हायला कधीही वेळ लागत नाही.त्यामुळे पुढील नक्षत्र कधी बदलणार हे सांगता येणार नाही; हेही तितकेच खरे किंवा खोटे आपलीच चार बोटे आपल्याकडेच; असे म्हणणेही चुकीचे ठरणार नाही.

