- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल शहरापासून काही अंतरावर असलेल्या बल्की देव वळणावर आज,बुधवार ८ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.अपघातात वडील व मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर दुसऱ्या दुचाकीवरील एकाचा रुग्णालयात नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला.यश देविदास शेंडे वय २२ वर्षे व त्याचे वडील देविदास शेंडे वय ४५ वर्षे, रा.मारोडा,ता.मूल,जि.चंद्रपूर दोघेही बापलेक जागीच ठार झाले,तर वासुदेव सहारे,रा.भादुर्णा यांचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला.धडक इतकी भीषण होती की,दोन्ही दुचाक्या चक्काचूर झाल्या.
आज बुधवारी यश व त्याचे वडील देविदास शेंडे काही कामानिमित्त मूल येथे गेले होते.तेथील कामे आटोपून दोघेही बापलेक त्यांच्या दुचाकीने गावाकडे परत निघाले होते.अश्यातच मूल शहरापासून काही अंतरावर असलेल्या बल्की देव वळणावर येताच भादुर्णा येथील वासुदेव सहारे हे मूलच्या दिशेने निघाले असतांना दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.धडक बसताच तिघेही खाली कोसळले.यात बापलेकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.सदरची घटना नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या वासुदेव सहारे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असतांनाच त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच मूल पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड पथकासह घटनास्थळी दाखल झाले.घटनेचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले असून घटनेचा पुढील तपास मूल पोलिसांनी सुरू केला आहे.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

