Wednesday, April 15, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथे रेल्वे रूळ ओलांडताना एका इसमाचा मृत्यू; मुंडके धडावेगळे..

देसाईगंज येथे रेल्वे रूळ ओलांडताना एका इसमाचा मृत्यू; मुंडके धडावेगळे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील चुना भट्टी जवळील रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेच्या मालगाडीने धडक दिल्याने एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल,मंगळवार १५ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.नवलाजी ठवरे वय ५५ वर्षे,रा.हेटी बंगला,देसाईगंज,जि.गडचिरोली
असे रेल्वे अपघातात मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे.
माहितीनुसार,नवलाजी ठवरे हे देसाईगंज शहरातील एका चहाच्या दुकानात काम करीत होते.काम आटोपल्यानंतर ते नेहमीप्रमाणे पायी-पायी आपल्या घराकडे निघाले होते.त्यांचे घर शहरातून जाणाऱ्या रेल्वेच्या पलीकडे असल्याने नवलाजी हे चुना भट्टी जवळील रेल्वे रूळ ओलांडत असतांना तितक्यातच गोंदियाकडून बल्लारशहाकडे जाणारी मालगाडी हॉर्न वाजवत आली.मात्र,नवलाजी यांना बरोबर ऐकू येत नसल्याने व वयोमानानुसार नीट चालता येत नसल्याने गाडीखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.रेल्वे रुळाचे चाक मानेवरून गेल्याने मुंडके धडावेगळे झाले व एक पाय तुटला.सदरची घटना काही नागरिकांनी प्रत्यक्ष डोळ्यादेखत बघितल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.घटनेची माहिती होताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.याबाबत देसाईगंज पोलिसांना कळताच  घटनास्थळी धाव घेतली.मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात  पाठविला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!