Thursday, August 6, 2026
Homeनवी दिल्लीदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून अखेर अंतरिम जामीन मंजूर…

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून अखेर अंतरिम जामीन मंजूर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

दिल्ली :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून अखेर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.सुप्रीम कोर्टाने केजरीवालांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांच्या पीठाने आज शुक्रवारी जामीन मंजूर केला.त्यांनी २ जूनला पुन्हा स्वतः न्यायालयासमोर हजर व्हावे; असे कोर्टाने म्हटले आहे.

केजरीवाल यांना निवडणुकीत प्रचार करता यावा; म्हणून कोर्टाने हा निर्णय दिला आहे.२१ मार्चपासून केजरीवाल ईडीच्या कोठडीत आहेत.”ही अटक आधी किंवा नंतर व्हायला हवी होती.आता आम्ही २१ दिवस देत आहोत, “असे जस्टीस संजीव खन्ना म्हणाले.

केजरीवाल यांनी अटकेला आव्हान देणारी याचिका केली आहे.त्यासह या प्रकरणावरची सुनावणीही लवकरच पूर्ण करणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.अद्याप निकालाची कॉपी मिळालेली नसल्याने या जामीनाच्या आणखी काय अटी असतील हे समोर आलेले नाही.यापूर्वी झालेल्या सुनावणीत केजरीवालांच्या जामीन आर्जाला ईडीने विरोध केला होता.निवडणुकीचा प्रचार करणे हा मूलभूत अधिकार नाही किंवा घटनात्मक अधिकारही नाही,असे ईडीने गुरुवारी म्हटले होते.

जस्टिस संजीव खन्ना यांच्या पीठाने केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना आज,शुक्रवारी निर्णय देणार असे स्पष्ट केले होते.अरविंद केजरीवाल यांना २१ मार्चला दिल्लीच्या मद्यधोरण प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता केजरीवालांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!