उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- राज्यातील स्टेट बोर्डाच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेचे निकाल लवकरच म्हणजे याच महिन्यात लागणार आहे.शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार,बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या,तर दहावीचा निकाल चौथ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.सध्या निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षांचे आयोजन केले होते.त्यानंतर आता या दोन्ही वर्गांच्या विद्यार्थी व पालकांना निकालाचे वेध लागलेत.त्यातच सीबीएसईच्या दहावी व बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाल्यामुळे स्टेट बोर्डाच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीचा निकाल लवकरच लागण्याची महत्त्वाची बातमी आली आहे.
बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागेल.त्यानंतर चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल घोषित केला जाईल.दहावीच्या परीक्षेचे पेपर तपासणीचे काम हातावेगळे झाले आहे.आता निकाल तयार करण्याच्या कामावर शेवटचा हात फिरवला जात आहे.हे काम झाले तर मे महिन्याच्या शेवटी हा निकाल जाहीर केला जाईल.
बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमकि परीक्षा मंडळ मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात निकाल जाहीर करु शकते.दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या उत्तर पत्रिका तपासणीचे काम बोर्डाकडून तयार झाले आहे.उत्तर पत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले असून आता निकालाच तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.

