उद्रेक न्युज वृत्त :-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोठे पाऊल उचलत देशातून ३१ मार्च २०२६ पर्यंत संपूर्ण नक्षलवाद संपुष्टात आणण्याचा मोठा संकल्प केला आहे आणि त्या दिशेने कारवाया सुरू असतांनाच पोलिसांना मोठे यश मिळू लागले आहे.नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाया,नवीन सुरक्षा छावण्यांची स्थापना आणि विकास प्रकल्पांचा वाढता विस्तार यामुळे नक्षलवाद्यांचा प्रभाव सातत्याने कमी होत आहे.अश्यातच छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात तब्बल २२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.सुकमाचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण म्हणाले की,एका महिलेसह या कार्यकर्त्यांनी सरकारच्या ‘पूना मार्गेम’ (न्यू डॉन) पुनर्वसन योजनेअंतर्गत वरिष्ठ पोलिस आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांसमोर काल मंगळवारी आत्मसमर्पण केले आहे.आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली आणि सरकारच्या धोरणानुसार त्यांचे पुढील पुनर्वसन केले जाईल. नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यात जिल्हा राखीव रक्षक(DRG)सुकमा,जिल्हा बल सुकमा,रेंज फील्ड टीम(RFT)जगदलपूर आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाने महत्त्वाची भूमिका बजावली,असेही पोलिस अधीक्षक किरण चव्हाण म्हणाले.
तब्बल २२ नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

