Monday, May 25, 2026
Homeनागपूरडॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूची बातमी शहरभर रिक्षावर फिरून रडत-रडत सांगणारे मोरे यांचे निधन..

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूची बातमी शहरभर रिक्षावर फिरून रडत-रडत सांगणारे मोरे यांचे निधन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले.आंबेडकर यांच्या निधनाची बातमी संपूर्ण देशात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांच्या काळजाचा ठेका चुकला होता.अनेकांना बाबासाहेब आपल्याला सोडून गेलेत,असा विश्वासच बसेनासा झाला होता.अशातच  आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाची हृदय हेलावणारी बातमी रिक्षावर शहरभर फिरून रडत-रडत सांगणारे ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते दामू मोरे उर्फ दामूदा शिवाजी मोरे यांचे काल सोमवारी ९२ व्या वर्षी निधन झाले.त्यांनी मृत्यूपूर्वी केलेल्या संकल्पानुसार त्यांचे मेडिकलला देहदान करण्यात आले.दामू मोरे यांचा जन्म एका आंबेडकरी कुटुंबात झाला.साउंड सर्व्हिसचा (डेकोरेशन) त्यांच्या घरगुती व्यवसाय होता.मोरे साऊंड सर्व्हिस तेव्हा चांगलेच प्रसिद्ध होते.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा दामू हे केवळ १२ वर्षांचे होते.त्या दिवशी दुकानात असतांना बातमी मिळाली ‘बाबासाहेब गेले’. घरातील मोठ्यांनी स्वतःचा शोक बाजूला ठेवून,ही बातमी जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी लहानग्या दामूवर सोपविली होती.त्या दिवशी नागपूरच्या गल्लीबोळांमध्ये एका रिक्षातून फिरणारा हा छोटा मुलगा,हातात माईक घेऊन,संपूर्ण देशाच्या भावनांवर घाला घालणारी बातमी सांगत होता.लोकांच्या डोळ्यांत पाणी आले,काहींनी विश्वास न बसून त्याच्यावर ओरड केली,काहींनी बातमी खोटी निघाल्यास जिवंत गाडण्याची धमकीही दिली.काहींनी रागाने धाव घेतली; पण त्या आवाजामागे फक्त एक पोरगं नव्हतं,तर एक जबाबदारी होती,एक सत्य होतं आणि एक असीम वेदना होती.दामू मोरे ही आठवण नेहमी सांगायचे.त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांच्या कुटुंबीयांनी काल सोमवारी मेडिकलमध्ये त्यांचे देहदान केले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक,मुलगा व मोठा आप्त परिवार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!