- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जेवण केल्यानंतर काही वेळातच ३१ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १५ विद्यार्थ्यांना उलट्या,मळमळ व अशक्तपणा जाणवू लागल्याने आश्रम शाळेत एकच खळबळ उडाली.सदरची घटना नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील काचुरवाही येथील सूरज मतिमंद (गतिमंद)मुला-मुलींच्या निवासी शाळेत घडली.शाळा प्रशासनाने घटनेची माहिती रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय वाघमारे यांना दूरध्वनीद्वारे दिली.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता डॉ.वाघमारे यांनी त्वरित वैद्यकीय पथक शाळेकडे रवाना केले.शाळेत पोहोचलेल्या डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना तात्काळ रामटेक उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले.विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी पत्तागोबीची भाजी,डाळ व भात असा स्वयंपाक शाळेतील कुकने तयार करून विद्यार्थ्यांना देण्यात आला होता.मात्र,जेवणानंतर काही वेळातच १५ विद्यार्थ्यांना उलट्या,मळमळ व अशक्तपणा जाणवू लागल्याने शिक्षकांनी तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधला.दरम्यान,घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन डॉक्टरांकडून प्राथमिक माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी काचुरवाही येथील शाळेत जाऊन पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
- Advertisement -

