- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत सरळ सेवा व अनुकंपा तत्वावरील पदभरती ही शासन निर्णयानुसार पूर्णतः पारदर्शक पद्धतीने व प्रामाणिकपणे राबवली जात असून,उमेदवारांनी कोणत्याही दलाल, मध्यस्थ अथवा खोट्या आश्वासनांना बळी पडू नये,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)सुहास गाडे यांनी केले आहे.गट-क व गट-ड मधील रिक्त पदे सरळसेवा, पदोन्नती व बदली प्रक्रियेद्वारे भरण्यात येतात. त्याचप्रमाणे,अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी प्रतिक्षा सुचित उमेदवारांना आवश्यक दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले जाते.पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शैक्षणिक पात्रता,संवर्गातील उपलब्ध जागा व ज्येष्ठतेनुसार पारदर्शक समुपदेशनाद्वारे नियुक्त्या दिल्या जातात,असे सुहास गाडे यांनी कळविले आहे.
- Advertisement -

