- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(देसाईगंज):-पर्यावरणाचे संवर्धन व्हावे म्हणून राज्य शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत आहे.पडीक जमीन लागवडीखाली आणून आर्थिक उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी बांबू लागवडीचे अभियान राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात बांबू लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायतींनाही उद्दिष्ट देण्यात आले आहे.देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा ग्रामपंचायतीला १ हजार ३०० बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले.त्यानुसार गुरुवार दिनांक-८ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास बांबू लागवडीसह विविध प्रजातींचे वृक्षारोपण स्मशानभूमी परिसरात ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याने प्रत्येकांनी एक तरी वृक्ष लावणे गरजेचे आहे.केवळ नुसते वृक्ष लावून चालणार नाही तर त्याची जोपासना करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.संतांच्या म्हणीप्रमाणे ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ हे ध्यानी-मनी बाळगून आज कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील स्मशानभूमी परिसरात कडू लिंब,सीताफळ, जांभूळ तसेच विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.त्याचबरोबर बांबू लागवड करून पडीक जमीन लागवडीखाली आणली जाणार असल्याचे प्रसंगी सरपंचा अपर्णा राऊत यांनी सांगितले.
बांबू लागवडीसह विविध प्रजातींचे वृक्षारोपण करतेवेळी ग्रामपंचायत सरपंचा अपर्णा राऊत, उपसरपंच गजानन सेलोट,सदस्या भूमेश्र्वरी गुरूनुले,
पोलीस पाटील किरण कुंभलवार,ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका मेघा राऊत,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक योगेश ढोरे,रोजगार सेवक प्रकाश बेदरे,आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी,आशा वर्कर,उमेद बचत गटाच्या महिला वर्ग तसेच गावातील मजूर वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.
- Advertisement -

