Tuesday, September 1, 2026
Homeमुंबईग्रामपंचायतींना स्वतःची कार्यालय इमारत बांधण्यासाठी मिळणार अनुदान…-ग्रामविकास विभागाने घेतली दखल…

ग्रामपंचायतींना स्वतःची कार्यालय इमारत बांधण्यासाठी मिळणार अनुदान…-ग्रामविकास विभागाने घेतली दखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागात दोन हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या,परंतु स्वतंत्र इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना बांधकामासाठी राज्य सरकारकडून २५ लाख रूपयांचे अनुदान मिळणार आहे.तसेच ग्रामपंचायत स्वनिधीची अटही रद्द करण्यात आली आहे.याबाबत ग्रामविकास विभागाने शुक्रवारी शासन निर्णय जारी केला आहे.

राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही; अशा ग्रामपंचायतींना स्वतःची कार्यालय इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना लागू करण्यात आली आहे.अशा ४ हजार २५२ ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय बांधण्यासाठी २०१८-१९ ते २०२१-२२ या चार वर्षांसाठी मंजूरी देण्यात आली होती.त्यानुसार १ हजार ७४८ पंचायतींना स्वतःचे कार्यालय बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.आता योजनेला २०२७-२८ पर्यंत मुदतवाढ देतानाच इमारत बांधकामासाठीच्या निधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार इमारत नसलेल्या दोन हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या पंचायतींना १५ लाखाऐवजी २० लाख व दोन हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्यांना १८ लाखाऐवजी २५ लाखांचे अनुदान मिळणार आहे.

ग्रामसभेचा ठराव बंधनकारक👇

ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही; अशा ग्रामपंचायतींना बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून त्यांच्या कार्यालयाचे बांधकाम करावयाचे असल्यास त्यांना प्रथम ग्रामसभेत ठराव करावा लागणार आहे.ठराव संमत केल्यावर संबंधित ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय उपलब्ध नसल्याची तसेच कार्यालयासाठी जागा उपलब्ध असल्याची खात्री केल्यावर जिल्हा परिषदेकडून अंतिम मंजूरी दिली जाणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!