- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-एका अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या कुरखेडा तालुक्याच्या आंधळी येथील भूमिहीन कुटुंबातील ज्ञानेश्वर उईके हा रुग्ण मागील चार वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त होता. रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाची आर्थिक अवस्था इतकी बिकट होती की,आवश्यक ते वैद्यकीय उपचार घेणे त्यांच्यासाठी केवळ स्वप्नच बनले होते. आजारपण,गरिबी आणि असहाय्यताच्या कचाट्यात सापडलेल्या या कुटुंबाकडे कुणीही लक्ष देत नव्हते.या अत्यंत संवेदनशील परिस्थितीची दखल घेत समाजातील काही जागरूक व माणुसकी जपणाऱ्या व्यक्तींनी पुढाकार घेतला आणि “माणुसकी अजून जिवंत आहे” हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज उराडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आंधळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा समितीचे तालुकाध्यक्ष अप्रव भैसारे यांच्या नेतृत्वात लोकवर्गणीच्या माध्यमातून रुग्णासाठी आर्थिक मदत उभी करण्यात आली.या उपक्रमात समाजसेवक जीवन नाट,चांगदेव फाये, विनोद खुणे,हेमंत सेंदरे,ग्रामसेवक कन्नाके,ग्रामसेविका डोंगरवार,देवीकर,लाडे(मुख्याध्यापक व कर्मचारी),भारत डोंगरे,गौरव रामटेके,गणेश भैसारे, सुरेंद्रसिंग गौतम तसेच आरोग्य उपकेंद्र विभागाच्या टीमने सक्रिय सहभाग नोंदवून मोलाचे सहकार्य केले. प्रत्येकाने आपल्या परीने दिलेल्या हातभारामुळे एक मोठी मदत उभी राहिली आणि अखेर ज्ञानेश्वर उईके यांना आवश्यक उपचारासाठी आर्थिक आधार मिळाला.विशेष म्हणजे,
गरजू,गरीब, भूमिहीन आणि दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना केवळ आश्वासनांची नव्हे,तर ठोस कृतीची गरज आहे आणि हीच जाणीव या घटनेतून ठळकपणे समोर येते.
- Advertisement -

