Saturday, April 18, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीत १२ कोटी ७६ लाख रुपयांची गुंतवणूक..

गडचिरोलीत १२ कोटी ७६ लाख रुपयांची गुंतवणूक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदिवासी विकास,कृषी क्षेत्र व पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष देण्याच्या दूरदृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यासाठी १२.७६ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी ‘समग्र विकास प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी समुदायाला उपजीविका,रोजगार आणि जलसुरक्षेचा असा तिहेरी फायदा होणार आहे.
  • प्रकल्पाची उद्दिष्टे आणि व्याप्ती👇
‘हिंदुस्तान युनिलिव्हर फाऊंडेशन’ (HUF) आणि ‘वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट’ (WOTR) यांच्या सहकार्याने हा प्रकल्प मे २०२५ ते मार्च २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीत एटापल्ली तालुक्यातील ३० गावांमधील ३ हजार शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणार आहे.हा प्रकल्प आदिवासी समुदायाच्या जीवनमानाचा दर्जा उंचावून त्यांना पूर्णपणे स्वयंपूर्ण बनवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.यामध्ये जल टंचाई,शेती,आणि वन-आधारित उपजीविकेच्या समस्यांचे निराकरण केले जाईल.
तिहेरी फायद्याचे प्रमुख आकडेवारी (३ वर्षांत अपेक्षित):
उपजीविकेला बळ (उत्पन्न वाढ)
या प्रकल्पातून सहभागी शेतकऱ्यांसाठी १५.१२ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न(Additional income) निर्माण होईल,ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती लक्षणीयरित्या सुधारण्यास मदत होईल.यासोबतच ४ हजार २१२ टन अतिरिक्त कृषी उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.
रोजगार निर्मिती:
प्रकल्पाच्या माध्यमातून गावातच ४ लाख ३० हजार ६०० मनुष्य दिवस(Person Days)इतक्या अतिरिक्त रोजगाराची निर्मिती होईल.यामुळे शिक्षित तरुणांचे स्थलांतर थांबेल आणि आदिवासी महिलांना कृषी-व्यवसाय तथा वन-आधारित व्यवसायांमध्ये सक्रिय सहभाग घेता येईल.
जलसुरक्षा(पाण्याची बचत):
या प्रकल्पात जलसंधारण आणि जल व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे.परिणामी, तीन वर्षांत तब्बल ९.६ अब्ज लिटर(Billion Litres) पाण्याची बचत साधण्याचे महत्त्वाचे लक्ष्य आहे.
आर्थिक तपशील👇
हा ‘होलीस्टिक डेव्हलपमेंट’ प्रकल्प यशस्वी करण्यासाठी एकूण १२ कोटी ७६ लाख ७ हजार २५२ रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.यापैकी हिंदुस्थान युनिलिव्हर फाऊंडेशनचे योगदान ६ कोटी ८६ लाख ७६ हजार १०५ रुपये असून उर्वरित रक्कम ५ कोटी ८९ लाख ३१ हजार १४७ रुपये सह-निधीतून जमा करण्यात येत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या पुढाकारामुळे गडचिरोलीतील आदिवासी समुदायाला शाश्वत विकासाच्या दिशेने मोठी गती मिळणार,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!