- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-एखादा विवाह पार पाडण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते.लग्न मंडप,डेकोरेशन,डीजे व जेवणाच्या तयारीपासून ते काहींना जनम घुट्टीचीही तजवीज करावीच लागते; अन्यथा रुसवे-फुगवे यांना सामोरे जावे लागत असते.मात्र,बालविवाह करणे बाल प्रतिबंधक २००६ च्या कायद्यान्वये गुन्हा असून याचे अनेकजण उल्लंघन करतांना दिसून येतात.अश्याच प्रकारे लग्न मंडप सजला,डेकोरेशन झाले,डीजेच्या तालावर नाच-गाणे सुरू झाले,वऱ्हाडीही जमले आणि जेवणाची तयारीही झालेली होती.अश्यातच काही वेळातच लग्न लागणार तोच माहिती मिळाली बालक व बालिकेचे जन्म प्रमाणपत्र तपासा आणि ग्रामसेवकांनी दोघांचीही जन्म प्रमाणपत्रे तपासली.प्रमाणपत्रानुसार बालकाचे वय पूर्ण नसल्याचे लक्षात येताच लग्नात विघ्न आल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द गावात काल सोमवारी सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास घडली.प्रकरणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनात दामिनी पथक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष,चाइल्ड हेल्पलाइन,इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी व तिरोडा पोलिस यांच्या संयुक्ताने नियोजित बालविवाह थांबविण्यात आला. प्रसंगी बालविवाह केल्यामुळे होणारे दुष्परिणाम सर्वांना समजावून सांगण्यात आले.वय पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही,असे हमीपत्र आणि संमती पत्र बालकांच्या आई-वडिलांकडून आणि नातेवाइकांकडून लिहून घेण्यात आले.
- Advertisement -

