- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गडचिरोलीचे पालकमंत्री पद नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी नाही; तर तेथील मलिंदा खाण्यासाठी हवे असते;अशी खोचक टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार यांनी आज,सोमवारी २३ डिसेंबरला सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीत पालकमंत्री पदावरून असलेल्या वादावर भाष्य केले.तसेच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणावरून सरकारला सवाल केला.स्वतःच्या फायद्यासाठी पालकमंत्री पदावरून वाद सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी महायुती सरकारवर केली आहे.
फक्त सत्ता आपल्या हाती असावी,या भागात होणारे आर्थिक व्यवहाराची सूत्र आपल्या हाती असावी म्हणून पालकमंत्र्यांवरून वाद आहे.गडचिरोलीचे पालकमंत्री पद काही लोकांना कायम आपल्याकडे हवे असते,मात्र,ते काही नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी नको असते.तर गडचिरोलीमध्ये ज्या मायनिंग कंपन्या आहेत,कोट्यावधी रुपयांचे उद्योग आहेत,तिथून मलिंदा मिळवा; त्यासाठी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद हवे असते,अशी टीका संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता केली आहे.गडचिरोली,चंद्रपूर भागात वनसंपत्तीचा नाश सुरू आहे.त्याचा वाटा आपल्याला मिळावा यासाठी तेथील पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे आणि असतेच,असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
कुणाला बीडचे पालकमंत्री पद मिळाल्याने सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणार आहे का?
परभणीचे पालकमंत्री पद कोणाला मिळाले तर पोलिस पोलीस कोठडीत हत्या झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळणार आहे का? असा सवाल करत मुंबई,उपनगर आणि ठाण्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत घमासान सुरू आहे.कल्याणमध्ये एखाद्याला पालकमंत्रीपद मिळाले,तर तेथील मराठी माणसावर अन्याय झाला,तो भविष्यात दूर होणार आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी केला.
- Advertisement -

