- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-हिवाळी अधिवेशन आटोपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले.राजभवनात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ज्याप्रमाणे भाजपचा वरचष्मा होता,त्याच पद्धतीने आता खाते वाटपात देखील भाजपचे वर्चस्व महत्त्वाच्या खात्यांवर दिसून येत आहे.फारशी नाराजी न दाखविता अर्थ खाते राखण्यात अजितदादा यशस्वी ठरले तर एकनाथ शिंदे यांना आता नगर विकासवरच समाधान मानावे लागणार आहे.गृह,महसूल,ऊर्जा,आदिवासी विकास, अन्न व नागरी पुरवठा,जलसंधारण, पर्यावरण, उच्च व तंत्रशिक्षण,माहिती तंत्रज्ञान,माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक आरोग्य,सामाजिक न्याय, कामगार,गृह (ग्रामीण),गृहनिर्माण,मत्स्य विभाग बंदरे अशी महत्त्वाची खाती भाजपने आपल्याकडेच ठेवली असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यावेळी प्रमाणे अर्थ,अन्न व औषधी प्रशासन,महिला बालविकास,वैद्यकीय शिक्षण ही खाती आहेत.याचवेळी शिवसेनेकडे नगर विकास, शालेय शिक्षण,माती व पाणी परीक्षण,अर्थ नियोजन, गृह (शहर) राज्यमंत्रीपद अशी खाती आहेत.एकंदरीत सर्वाधिक आमदार असल्याने भाजप सहयोगी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा यावेळी अधिक आक्रमकपणे,स्वबळावर पुढे जाण्याच्या पावित्रात दिसत आहे.यामुळेच राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिले दोन दिवस राजी-नाराजी पहायला मिळाली. नेमकी तीच बाब टाळण्यासाठी आता अधिवेशन संपल्यानंतर सावधपणे खातेवाटप जाहीर करण्यात आले.त्यातच सर्व बाबींचा विचार करता खाते वाटप मंत्रीमंडळात यावेळी भाजपचाच पलडा भारी असल्याचे दिसून येत आहे; असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
- Advertisement -

