Saturday, September 5, 2026
Homeदेसाईगंजकोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू उपसा होतो व प्रशासनाकडून एक डकारही घेतली जात...

कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू उपसा होतो व प्रशासनाकडून एक डकारही घेतली जात नाही.. -अखेर कोट्यवधी रुपयांच्या अवैध वाळू उपसा प्रकरणी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू… – आंदोलनस्थळी राकाँचे तालुकाध्यक्ष क्षितिज उके यांची भेट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू उपसा होतो व प्रशासनाकडून एक डकारही घेतली जात नाही; याला काय म्हणावे.गावकरी,ग्रामपंचायत, सुजाण नागरिकांनी तक्रारी,गाऱ्हाणे मांडूनही मुंग गिळून पापड खाणे कितपत योग्य आहे; खरं तर अवैध वाळू उपसा होतांना प्रशासनाने काय केले? याचा उलगडा होणे आवश्यक असल्याने आज,सोमवार ३० डिसेंबर पासून देसाईगंज तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन नामदेव वसाके यांचे सह सत्यवान रामटेके यांनी सुरू केले आहे.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गट)देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके तसेच सामाजिक कार्यकर्ते नरेश वासनिक यांनी आंदोलनस्थळी भेट देत संबंधितांवर योग्य ती कारवाई लवकरात-लवकर व्हावी; यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
प्रसंगी आंदोलन कर्त्यांनी म्हटले की,एकीकडे बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना पाच ब्रास वाळूसाठी हा कागद आणा,त्या घाटातून वाळू द्यायची नाही,मोफत वाळू कशी काय मिळणार?  त्यांची नोंद ठेवा,असे नाना तऱ्हेचे नियम लादले जातात.याउलट वाळू चोरट्यांना नदी पात्रातील सारे रान मोकळे केले जातात; हा कुठला न्याय आहे. आमचा जन्मही झाला नसेल त्या काळापासून कोंढाळा-मेंढा वैनगंगा नदी पात्रात रेतीचा साठा तयार झालेला आहे.वाळूचे एक कण तयार व्हायला जवळपास दीड ते दोन वर्ष लागतात.मात्र,आजची स्थिती बघता नदी पात्रातील रेतीची पुरती वाट लागली आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपशावर प्रशासनाची एकदाही नजर न जाणे ही किती लाजिरवाणी बाब आहे.अवैध वाळू उपशाच्या माध्यमातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे.यांस जबाबदार कोण? चोर चोऱ्या करतात,तो त्यांचा कामच आहे; पण त्यावर आवर घालणारी व्यक्तीही त्यांची साथीदार असेल तर ‘चोरांच्या उलट्या बोंबा’ असे म्हणावेच लागेल. अनेकजण म्हणू लागलेत की,आजपर्यंत तुम्ही काय केलेत..! आम्ही काय केलेत म्हणण्यापेक्षा प्रशासनाने त्यावर उपाययोजना काय केल्यात?हेही तितकेच महत्त्वाचे आहे.आम्ही गाऱ्हाणी सांगून तक्रारी केल्या.पण त्या तक्रारींचे झाले काय? कागदाचे पान पलटलेच नाही; त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या अवैध वाळू उपसा प्रकरणी आमची लढाई सुरू असणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!