- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-अल्पवयीन मुली घरून पलायन होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढलेले दिसून येत आहे. अनेकांवर प्रेमाचे भूत सवारलेले दिसते.नाहीतर घरी सर्वकाही बरोबर असतांना काबाळकष्ट करणाऱ्या आई-वडिलांना सोडून असे कुणीही जात नसतो. काहीजण वय नसतांनाही स्वमर्जिने घर सोडतात आणि इतरांना त्याचे परिणाम भोगावे लागतात.अश्याच प्रकारे गोंदिया शहर व तिरोडा तालुक्यातील मुली घरी न परतल्याने कुटूंबीय चिंतातुर होऊन पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.कॉलेजसाठी निघालेल्या दोन तर स्टेशनरी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेली एक,अश्या तीन अल्पवयीन मुली गायब झाल्या आहेत.गोंदिया शहरातील कुंभारेनगर परिसरातील १७ वर्षीय मुलगी शनिवारी सकाळी १० वाजता दरम्यान स्टेशनरी खरेदीसाठी घराबाहेर पडली,मात्र परतली नसल्याने तिला अज्ञात व्यक्तीने आमिष देऊन पळवून नेल्याचा संशय आहे.अश्याच प्रकारे तिरोडा तालुक्यातील ग्राम बोदा येथील १४ वर्षीय मुलगी शुक्रवारी पहाटे ६ वाजता तुमसर येथे परीक्षा आहे,असे सांगून घरातून निघाली.मात्र सायंकाळपर्यंत घरी परतली नाही.तिचा मोबाइल बंद असून,तिला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार पालकांनी केली आहे.अश्याच प्रकारे लगतच्या ग्राम नंगपूरा मुर्ती येथील १६ वर्षीय मुलगी शनिवारी सकाळी ८.३० वाजता कॉलेजसाठी घरून निघाली मात्र बराच कालावधी ती घरीच परतली नाही.तिन्ही घटनांसंदर्भात संबंधित पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -

