- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील काही भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यामुळे नुकसान झालेल्या भागातील पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक दौऱ्यावर गेले होते.अशातच कोकाटेंनी शेतकरी कर्जमाफीसह अनुदान संदर्भात वादग्रस्त विधान केले आहे.वादग्रस्त वक्तव्यानंतर शेतकरी संतप्त झाले आहेत.
नाशिकमध्ये नुकसानीची पाहणी करतांना कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.त्यातच एका शेतकऱ्याने त्यांना कर्जमाफीबाबत थेट प्रश्न विचारला, ‘अजित पवार म्हणाले की कर्जमाफी होणार नाही मग नियमित कर्ज भरणाऱ्यांना कर्जमाफी मिळेल का?’ या प्रश्नावर कोकाटे यांनी उत्तर देतांना म्हटले की, ‘जे शेतकरी कर्ज वेळेवर फेडतात त्यांनी फेडावे पण अनेकजण पाच-दहा वर्ष फक्त कर्जमाफीची वाट बघतात.कर्ज घेतात आणि काही भरत नाहीत.आणि जेव्हा कर्जमाफी होते तेव्हा मिळालेल्या त्या पैशांचा उपयोग शेतीसाठी होतो का? एक रुपयाचीही गुंतवणूक शेतीत करता का? असा थेट सवाल त्यांनी शेतकऱ्याला केला.सरकार शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विविध योजना देते,त्यामध्ये पाईपलाईन,सिंचन, शेततळे अशा योजना समाविष्ट आहेत.पण शेतकऱ्यांकडून या निधीचा उपयोग शेतीत करण्याऐवजी वैयक्तिक खर्चासाठी होतो,तुम्ही पीक विमा मागता,पण त्या पैशांतून साखरपुडे करता,लग्न करता,’ असे कोकाटे उपस्थित शेतकऱ्यांना म्हणाले.
कृषी मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून टीकेची झोड उठली आहे.शेतकऱ्यांनी म्हटले की,कोकाटे हे देखील शेतकरी कुटुंबातील असून अनुदानाच्या पैशातून आम्ही लग्न करतो की कर्ज घेऊन शेती करतो हे कोकाटे यांनी एकदा येऊन पहावे.कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे शेतकऱ्यांबद्दलचे हे पहिलेच वादग्रस्त विधान नाही तर यापूर्वीही कृषीमंत्री कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले आहे.माणिकराव कोकाटे यांनी अमरावती येथे शेतकऱ्यांच्या पिकविमा संदर्भातील प्रश्नावर बोलतांना एक वादग्रस्त विधान केले होते.ते म्हणाले होते की, “भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही,पण आम्ही एक रुपयात पिकविमा दिला.” या वक्तव्यामुळे राज्यातील शेतकरी संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती.अशातच आता पुन्हा एकदा कोकाटे यांच्या वक्तव्यावरून शेतकऱ्यांमधून संतापाची लाट उसळली आहे.
- Advertisement -

