उद्रेक न्युज वृत्त :-दुर्गम भागात बऱ्याच कालावधीपासून लाल दहशतीचे सावट पसरले होते.यामुळे तेथील विकास कोसोदुर राहिला आणि अजूनही काही ठिकाणी जैसे-थे अवस्था पहावयास मिळत आहे.मात्र,आता हळूहळू चित्र बदलू लागले आहेत.ज्या ठिकाणी अट्टल लाल दहशत पसरली होती; अश्या ठिकाणची मुळे आता उपटली जाऊन अनेक जणांकडून हातात संविधान घेतले जात आहे.अश्याच प्रकारे छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील नक्षली दाम्पत्य दिर्दो विज्जल उर्फ जयलाल आणि पत्नी माडवी गंगी उर्फ विमला यांनी आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात शरणागती पत्करली.दोघांवर ३३ लाखांचे बक्षीस होते. दक्षिण उप-क्षेत्रीय समितीचे सदस्य असलेल्या या जोडप्यामुळे नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.तर दुसऱ्या ठिकाणी मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात ७७ लाखांचे बक्षीस आणि तीन राज्यांचा मोस्ट वाँटेड असलेला कबीर याच्यासह १० नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले.शनिवारी मध्यरात्री फॉरेस्ट गार्डच्या मदतीने हे नक्षलवादी आयजी कार्यालयात हजर झाले,तर काल रविवारी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत त्यांनी शस्त्रास्त्रे खाली ठेवत हातात संविधान स्वीकारून शांतीचा व अहिंसेचा मार्ग स्विकारला आहे.
एका ठिकाणी पती-पत्नीने; तर दुसऱ्या ठिकाणी टॉप टेन नक्षलवाद्यांनी सोडली लाल दहशत..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

