Monday, August 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउद्यापासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा..

उद्यापासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई)इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला उद्या,मंगळवार १७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. मंडळाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार परीक्षा प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.विद्यार्थ्यांचा तणाव कमी करणे आणि मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शी करणे हा यामागील उद्देश आहे.परीक्षा सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल.त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रात हजर होणे अनिवार्य असून, त्यानंतर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही.विद्यार्थ्यांनी ही बाब विचारात घेत घरातून निघण्याचा सूचना मंडळाने केली आहे.यावर्षी इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनस्क्रीन केले जाईल,उत्तरपत्रिका स्कॅन करून डिजिटल सर्व्हरवर अपलोड केल्या जातील आणि परीक्षक संगणकाच्या माध्यमातून त्यांची तपासणी करतील.त्यामुळे त्रुटी कमी होऊन निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया जलद होईल.इयत्ता दहावीच्या उत्तरपत्रिका पारंपरिक पद्धतीनेच तपासल्या जातील. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपातही बदल केला गेला आहे.सुमारे ५० टक्के प्रश्न केस स्टडी आणि वास्तविक जीवनावर आधारित असतील तर,२० टक्के बहुविकल्पीय आणि ३० टक्के वर्णनात्मक प्रश्न राहतील.पाठांतराऐवजी विश्लेषणात्मक आणि संकल्पनात्मक समज वाढविण्यावर विशेष भर राहणार आहे.उत्तरपत्रिका लेखनासाठी कडक निर्देश जारी केले आहेत.विज्ञान आणि सामाजिक विज्ञान विषयांमध्ये विभागनिहाय उत्तर लिहिणे अनिवार्य असेल.चुकीच्या विभागात दिलेले उत्तर मूल्यांकनात समाविष्ट केले जाणार नाही.तसेच,परीक्षा केंद्रावर कॅलक्युलेटर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाण्यास पूर्णतः बंदी आहे.विशेषतः यावर्षीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना एका शैक्षणिक वर्षात दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळेल.फेब्रुवारी-मार्चमध्ये मुख्य परीक्षा होईल,तर मे महिन्यात सुधार परीक्षा देता येईल. दोन्हीपैकी ज्या सत्रात जास्त गुण मिळतील,तेच गुण अंतिम निकालात ग्राह्य धरले जातील.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!