- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-आजची तरुणाई झटपट पैसा आणि हिरोपंतीच्या नादात वाममार्गाला जाऊ लागली आहे.यात सर्वच तरुणांना दोष देता येणार नाही.तर काही तरुण याला अपवादही आहेत.अनेक तरुण परिस्थितीशी सामना करून येणाऱ्या संकटांना सामोरे ढकलून आयुष्य घडविण्याचे कार्य करतांना दिसून येतात.अश्यातच बीई(बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग)म्हणजेच अभियांत्रिकीची पदवी प्राप्त ३० वर्षीय तरुण आपल्या तांत्रिक ज्ञानाचा गैरवापर करायचा व नकली पोलीस बनून नागरिकांकडून खंडणीची मागणी करायचा.तो एवढ्यावरच न थांबता इंटरनेटद्वारे विविध हॉटेल चालक, लॉज मालक आणि व्यावसायिकांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांना लक्ष्य करत होता.मात्र,चोर कितीही शातिर दिमाख वापरत असला तरीही खाकीच्या पॉवरातून सुटूच शकत नाही आणि तसेच झाले.नकली पोलीस बनून नागरिकांना ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपी तरुणाच्या असली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चंदन दिगूराम सांगळे वय ३० वर्षे,रा.आष्टी ता.चामोर्शी, जि.गडचिरोली असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्यास अहिल्यानगरच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे.न्यायालयात हजर केले असता,त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आरोपी चंदन हा तांत्रिक माहितीच्या आधारे इंटरनेटद्वारे संपर्क क्रमांक मिळवून स्वतःला पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून खंडणीची मागणी करायचा.अश्याच प्रकारे त्याने अहिल्यानगर येथील एका व्यक्तीला फोन करून ‘मी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहूल पाटील बोलत आहे’ तुमच्या विरोधात गंभीर तक्रार असल्याने यातूनतुम्हाला व तुमच्या कुटुंबाला अटक करायची नसेल तर ५ लाख रुपये द्यावे लागेल,अशी फोनवरून धमकी दिली. लागलीच याबाबत अहिल्यानगरच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता अहिल्यानगरचे एसपी सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनात सायबर पथकाने कॉल डिटेल्स,आयपी लॉग्स व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता
आरोपीचे लोकेशन गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरात दिसून आले.लोकेशनची माहिती कळताच अहिल्यानगरचे पोलीस पथक गडचिरोलीत दाखल झाले.तेथून अहिल्यानगरचे पोलिस पथक आष्टी परिसरात येत असल्याची भनक
आरोपीला लागताच त्याने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता अहिल्यानगर पोलिसांनी आष्टी पोलिसांच्या मदतीने पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.पोलीस तपासात त्याच्याविरुद्ध रत्नागिरी आणि गोंदिया जिल्ह्यात यापूर्वी फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे.
- Advertisement -

